रायपूर : एफआयएच स्पर्धेत ३३ वर्षांनंतर पदक जिंकलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमॅन्स यांनी म्हटले आहे की, हॉलंडवरील विजयामुळे मिळालेल्या कांस्यपदकामुळे संघाचा आत्मविश्वास वाढणार असून, रियो आॅलिम्पिकच्या तयारीसाठी यातून मदत मिळणार आहे.भारतीय हॉकी संघाने काल हॉलंडला हरवून कांस्यपदक जिंकले होते. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला ३३ वर्षांनंतर हे पदक मिळाले आहे. रविवारच्या सामन्यात दोन गोलनी पिछाडीवर पडल्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या हॉलंडला शूटआउटमध्ये हरवून भारताने कांस्यपदक जिंकले होते. ओल्टमॅन्स म्हणाले, आम्ही चांगले खेळलो तर कोणत्याही संघाला हरवू शकतो, असे या पदकाने दाखवून दिले आहे. साखळी फेरीत आमची कामगिरी चांगली झाली नव्हती, त्यामुळे हा विजय महत्त्वाचा ठरतो. ओल्टमॅन्स यांनी भारताचा कर्णधार सरदार सिंह आणि गोलरक्षक पी. आर. श्रीजेश यांचीही स्तुती केली. ते म्हणाले, श्रीजेश आणि सरदारने महत्त्वाचे योगदान दिले. इतर खेळाडूंनीही त्यांना चांगली साथ दिली. आमची कामगिरी सुधारली, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. (वृत्तसंस्था)आम्ही ३३ वर्षांनंतर पदक जिंकले आहे. निश्चितच ही मोठी कामगिरी आहे. आम्ही अनेक लहानसहान गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले होते. या विजयातून सकारात्मक प्रेरणा घेऊन आम्ही रियो आॅलिम्पिकपर्यंत घेऊन जाऊ.- सरदारसिंह, कर्णधार भारतआमच्यासाठी विजयाचे पर्व अनेक वर्षांनंतर आले आहे, त्यामुळे याचे सेलिब्रेशन नक्की करणार आहोत. गोल वाचवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती, कारण यातून संघाला ताकद मिळते. ज्यावेळी संघाचा गोल होतो त्यावेळी मलाही आनंद होतो. त्यामुळे हा विजय माझा एकट्याचा नसून संपूर्ण संघाचा आहे. - पी. आर. श्रीजेश, गोलरक्षक, भारत
कांस्यपदकामुळे ‘मिशन रियो’ला बळकटी
By admin | Updated: December 8, 2015 02:20 IST