शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिस्बेन कसोटी: दिवसाखेर भारत ४ बाद ३११

By admin | Updated: December 17, 2014 13:16 IST

मुरली विजयच्या शानदार शतकाच्या(१४४) जोरावर भारताने दिवसाअखेर ४ गडी गमावत ३११ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

ब्रिस्बेन, दि. १७ - मुरली विजयच्या शानदार शतकाच्या(१४४) जोरावर भारताने दिवसाअखेर ४ गडी गमावत ३११ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाचे तीन गडी पटापट  धवन (२४), पुजारा (१८) व कोहली (१९) पटापट तंबूत परतल्याने भारताची अवस्था बिकट झाली होती मात्र मुरली विजयने (१४४) भारताचा डाव सावरला. मात्र लियॉनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने सुटकेचा नि:श्वास टाकला. सध्या अजिंक्य रहाणे (नाबाद ७५) व रोहित शर्मा (२६) खेळत उद्या कसोटीच्या दुस-या दिवशी खेळपट्टीवर टिकून राहून मोठी धावसंख्या उभारायची जबाबादीर त्यांच्यावर आहे. ऑस्ट्रेलियातर्फे हेजलवूडने २ तर लियॉन व  मार्शने १ बळी टिपला. 
 
अ‍ॅडलेडवरील पहिल्या कसोटीत भारत अवघ्या ४८ धावांनी पराभूत झाला आणि ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली. मात्र, यशस्वी आणि अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी परतल्यामुळे संघात नवचैतन्य आलेआहे. तर मायकेल क्लार्कच्या दुखापतीमुळे तरूण स्टिव्ह स्मिथ याच्याकडे आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
 
ऑस्ट्रेलिया संघ कर्णधारासह काही नव्या बदलांनी सामन्यात उतरला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दुस-या कसोटीसाठी संघात जोश, हेजलवूड आणि मिशेल स्टार्क यांना स्थान दिले आहे. रियान हॅरिस व पिटर सिडल यांना विश्रांती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त क्लार्कच्या जागी संघात शॉन मार्शचे आगमन झाले आहे.