शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

पेणमधील मुलांनी केला २३३ किलोमीटर अंतरपोहून पार करण्याचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:35 IST

पेण येथील सहा मुलांनी रिले पद्धतीने धरमतर ते एलिफंटा हे २३३ किलोमीटर अंतर सलग सहा वेळा ७५ तास ७ मिनिटे आणि ५५ सेकंदात पार करून एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

वडखळ : पेण येथील सहा मुलांनी रिले पद्धतीने धरमतर ते एलिफंटा हे २३३ किलोमीटर अंतर सलग सहा वेळा ७५ तास ७ मिनिटे आणि ५५ सेकंदात पार करून एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.भावेश कडू (१२), नील वैद्य (१२), मधुरा पाटील (१२), श्रवण ठाकूर (१४), अथर्व लोधी (१४) आणि सोहम पाटील (१३) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी ५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी धरमतर बंदरावरून समुद्रात उड्या मारल्या आणि बुधवार, ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी धरमतर ते एलिफंटा हे अंतर तीन रात्र आणि चार दिवस असे सलग पार करीत असताना भरती-ओहोटीचा सामना करत, समोरून येणाऱ्या लाटांचा मारा सहन करत आणि निसर्गातील विविध पद्धतीच्या बदलांवर मात केली. आजपर्यंत अशा प्रकारे रिले पद्धतीने १६६ किलोमीटर अंतर पोहून पार करण्याचा विक्रम रचला गेला आहे. मात्र, आज यांनी २३३ किलोमीटरचे अंतर पार करून देशातील रिले पद्धतीने सर्वात जास्त किलोमीटर अंतर पार करण्याचा विक्रम रचला आहे.>बेस्ट आॅफ इंडिया आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद होईल, अशा प्रकारची उल्लेखनीय कामगिरी या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यांच्या या मेहनतीला दाद द्यावी तेवढी कमीच.- संतोष पाटील, आयोजकसराव फार कठीण होता, कोणत्याही समस्यांवर मात करता यावी, यासाठी मी दिवसाबरोबरच रात्रीदेखील या विद्यार्थ्यांचा समुद्रात पोहोण्याचा सराव घ्यायचो आणि ते त्यात यशस्वीदेखील झाले आहेत.- हिमांशू मलबारी, प्रशिक्षक>समोरून येणाºया सागरी लाटा, लागणारे करंट यांचा सामना करत आम्ही अंतर पार करत होतो, त्यातच रात्री पडलेली कडाक्याची थंडी हेसुद्धा आव्हान तेवढेच मोठे होते; पण या सर्वांवर मात करून आज आम्ही हे यश प्राप्त केले आहे त्याबद्दल समाधान वाटते. - स्पर्धक विद्यार्थी