शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

गोलंदाजांची केली पाठराखण

By admin | Updated: January 17, 2015 03:01 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागत असले

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागत असले, तरी मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी मात्र गोलंदाजांची पाठराखण केला. भारतीय गोलंदाजांना अनुभव नसल्याचा यजमान संघाच्या फलंदाजांनी लाभ घेतला, असेही फ्लेचर म्हणाले.फ्लेचर यांना आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय गोलंदाजीबाबत विचार व्यक्त करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे मान्य केले; पण गोलंदाजांवरील टीका होत काहीअंशी निरर्थक असल्याचे स्पष्ट केले. भारतीय संघाच्या विदेशातील निराशाजनक कामगिरीमुळे नेहमी टीकेचे लक्ष्य ठरलेले फ्लेचर म्हणाले, ‘‘गोलंदाजांवर बरीच मेहनत घेण्याची गरज आहे, याबाबत मी सहमत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे; पण, माझ्या मते भारताच्या वेगवान गोलंदाजांवर विनाकारण टीका झालेली आहे.’’फ्लेचर म्हणाले, ‘‘या गोलंदाजांना येथील परिस्थितीचा अनुभव नव्हता. ईशांत शर्माने या मालिकेत ते सिद्ध केले.’’ आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेनंतर प्रशिक्षक म्हणून फ्लेचर यांचा करार संपणार आहे. फ्लेचर यांनी मोहंमद शमी व उमेश यादव यांची पाठराखण केली. या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलिया संघातील काही गोलंदाजांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. ‘‘कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांबाबत विचार करताना शमीने ३५.८०च्या सरासरीने १५ बळी घेतले. मिशेल जॉन्सनने ३५.३३च्या सरासरीने १३ पेक्षा अधिक बळी घेतले. त्यांची सरासरी जवळजवळ सारखी आहे. शमीचा हा पहिला दौरा होता. उमेशने ११ बळी घेतले. जोश हेजलवूड (१२ बळी) याच्या तुलनेत त्याने एक बळी कमी घेतला. कसोटी आणि वन-डे संघांत स्थान पक्के नसताना उमेशने ही कामगिरी केली, हे विसरता येणार नाही. संघातील स्थान पक्के नसताना गोलंदाजाचा आत्मविश्वास ढासळलेला असतो, तर त्याला लयही गवसत नाही. फ्लेचर यांनी भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले; पण त्यांनी फटक्यांची निवड करताना विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. आगामी विश्वकप स्पर्धेबाबत फ्लेचर म्हणाले, ‘‘प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजेतेपद कसे पटकवायचे, याची भारतीय खेळाडूंना चांगली कल्पना आहे. भारतीय संघ २०११च्या विजेतेपदाचा बचाव करू शकतो. मर्यादित षटकांच्या सामन्यांत अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकतो.’’फ्लेचर पुढे म्हणाले, ‘‘गेल्या ३ वर्षांत भारतीय संघ आयसीसीच्या ३ प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाला. त्यात आयसीसी टी२०- २०१२-१३ आणि २०१४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी- २०१३ या स्पर्धांचा समावेश आहे. यात भारतीय संघाने दोन सामने गमावले. त्यातील एक अंतिम लढत होती. भारतीय संघाची कामगिरी अभिमान बाळगण्यासारखी आहे. या स्पर्धांमध्ये संघ जवळजवळ एकसारखाच होता. त्यामुळे या खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव असून, त्यांना विजय कसा मिळवायचा, याची चांगली माहिती आहे.’’ (वृत्तसंस्था)