शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

गोलंदाजांची केली पाठराखण

By admin | Updated: January 17, 2015 03:01 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागत असले

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागत असले, तरी मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी मात्र गोलंदाजांची पाठराखण केला. भारतीय गोलंदाजांना अनुभव नसल्याचा यजमान संघाच्या फलंदाजांनी लाभ घेतला, असेही फ्लेचर म्हणाले.फ्लेचर यांना आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय गोलंदाजीबाबत विचार व्यक्त करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे मान्य केले; पण गोलंदाजांवरील टीका होत काहीअंशी निरर्थक असल्याचे स्पष्ट केले. भारतीय संघाच्या विदेशातील निराशाजनक कामगिरीमुळे नेहमी टीकेचे लक्ष्य ठरलेले फ्लेचर म्हणाले, ‘‘गोलंदाजांवर बरीच मेहनत घेण्याची गरज आहे, याबाबत मी सहमत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे; पण, माझ्या मते भारताच्या वेगवान गोलंदाजांवर विनाकारण टीका झालेली आहे.’’फ्लेचर म्हणाले, ‘‘या गोलंदाजांना येथील परिस्थितीचा अनुभव नव्हता. ईशांत शर्माने या मालिकेत ते सिद्ध केले.’’ आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेनंतर प्रशिक्षक म्हणून फ्लेचर यांचा करार संपणार आहे. फ्लेचर यांनी मोहंमद शमी व उमेश यादव यांची पाठराखण केली. या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलिया संघातील काही गोलंदाजांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. ‘‘कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांबाबत विचार करताना शमीने ३५.८०च्या सरासरीने १५ बळी घेतले. मिशेल जॉन्सनने ३५.३३च्या सरासरीने १३ पेक्षा अधिक बळी घेतले. त्यांची सरासरी जवळजवळ सारखी आहे. शमीचा हा पहिला दौरा होता. उमेशने ११ बळी घेतले. जोश हेजलवूड (१२ बळी) याच्या तुलनेत त्याने एक बळी कमी घेतला. कसोटी आणि वन-डे संघांत स्थान पक्के नसताना उमेशने ही कामगिरी केली, हे विसरता येणार नाही. संघातील स्थान पक्के नसताना गोलंदाजाचा आत्मविश्वास ढासळलेला असतो, तर त्याला लयही गवसत नाही. फ्लेचर यांनी भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले; पण त्यांनी फटक्यांची निवड करताना विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. आगामी विश्वकप स्पर्धेबाबत फ्लेचर म्हणाले, ‘‘प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजेतेपद कसे पटकवायचे, याची भारतीय खेळाडूंना चांगली कल्पना आहे. भारतीय संघ २०११च्या विजेतेपदाचा बचाव करू शकतो. मर्यादित षटकांच्या सामन्यांत अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकतो.’’फ्लेचर पुढे म्हणाले, ‘‘गेल्या ३ वर्षांत भारतीय संघ आयसीसीच्या ३ प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाला. त्यात आयसीसी टी२०- २०१२-१३ आणि २०१४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी- २०१३ या स्पर्धांचा समावेश आहे. यात भारतीय संघाने दोन सामने गमावले. त्यातील एक अंतिम लढत होती. भारतीय संघाची कामगिरी अभिमान बाळगण्यासारखी आहे. या स्पर्धांमध्ये संघ जवळजवळ एकसारखाच होता. त्यामुळे या खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव असून, त्यांना विजय कसा मिळवायचा, याची चांगली माहिती आहे.’’ (वृत्तसंस्था)