शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

काळ्या हरणाची शिकार भोवली

By admin | Updated: February 2, 2016 03:18 IST

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात काळ्या हरणाच्या शिकारप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर युवा अष्टपैलू रमीज खान याला रणजी संघातील स्थान गमवावे लागले.

इंदूर : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात काळ्या हरणाच्या शिकारप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर युवा अष्टपैलू रमीज खान याला रणजी संघातील स्थान गमवावे लागले. त्याची कारकीर्द आता अडचणीत आली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने (एमपीसीए) बंगालविरुद्ध ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत खेळल्या जाणाऱ्या रणजी उपांत्यपूर्व फेरीसाठी १६ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून, त्यातून रमीजला (२६) वगळले आहे. याबाबत विचारले असता एमपीसीएचे सचिव मिलिंद कनमडीकर म्हणाले, ‘‘आम्ही रणजी उपांत्यपूर्व फेरीसाठी रमीजचा मध्य प्रदेश संघात समावेश केलेला नाही. कारण तो काळ्या हरणाच्या शिकारप्रकरणी तुरुंगात असल्यामुळे निवडीच्या वेळी उपस्थित नव्हता.’’रमीज, त्याचे वडील महमूद खान आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना सागर जिल्ह्यात काळ्या हरणाच्या शिकारीच्या आरोपाखाली वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत १० जानेवारी रोजी रात्री अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून या दुर्मिळ वन्यप्राण्याच्या शवाचे अवशेष, रायफल, जिवंत काडतूस आणि चाकू आदी वस्तू जप्त करण्यात आल्या. रमीजचे वडील महमूद खान मध्य प्रदेशचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. सध्या ते एमपीसीए अंडर-२३ पुरुष संघाच्या निवड समितीचे सदस्य आहेत. सागर येथील वनाधिकारी (डीएफओ) डॉ. शिवप्रसाद तिवारी यांनी सांगितले, की काळ्या हरणाच्या शिकारप्रकरणी चारही आरोपींची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.तिवारी यांनी पुढे सांगितले, ‘‘काळ्या हरणाच्या शिकारप्रकरणी अटकेत असलेल्या महमूद व त्यांचा मुलगा रमीज यांच्याविरुद्ध योग्य पाऊल उचलण्यात यावे, असे गेल्या महिन्यात एमपीसीएला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.’’दरम्यान, डीएफओच्या पत्रानंतरही एमपीसीएने अद्याप याप्रकरणी पिता-पुत्रावर कुठलीही कारवाई केलेली नाही. याबाबत विचारले असता कनमडीकर म्हणाले, ‘‘आम्ही या प्रकरणात वकिलांचा सल्ला घेत असून, एमपीसीए योग्य ते पाऊल उचलणार आहे.’’(वृत्तसंस्था)काळ्या हरणाच्या शिकारप्रकरणी अटक होण्यापूर्वी रमीजचा मध्य प्रदेश रणजी संघाच्या प्रमुख खेळाडूंमध्ये समावेश होता. त्याने २०११ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या डावखुऱ्या फलंदाजाने मध्य प्रदेश संघाचे२६ प्रथम श्रेणी सामन्यांत प्रतिनिधित्व करताना १,१६९ धावा फटकावल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आठ बळीही घेतले आहेत.