शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

‘बिनधास्त खेळ’ ही टी-२० ची गरज

By admin | Updated: May 13, 2017 02:04 IST

आयपीएल-१० मधील साखळी सामन्यांचा शेवट होत असताना सामने अत्यंत चुरशीचे ठरताना दिसतात. प्ले आॅफमध्ये पहिल्या दोन स्थानांवर

सुनील गावस्कर लिहितात...आयपीएल-१० मधील साखळी सामन्यांचा शेवट होत असताना सामने अत्यंत चुरशीचे ठरताना दिसतात. प्ले आॅफमध्ये पहिल्या दोन स्थानांवर पोहोचण्यासाठी तसेच पात्रता गाठण्याची संघांची धडपड हृदयाचे ठोके चुकविणाऱ्या रोमहर्षक निकालांतून दिसून येत आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गुजरात लायन्स यांच्या प्ले आॅफच्या आशा आधीच मावळल्या. तरीही त्यांच्यातील चढाओढ एक चेंडू शिल्लक असेपर्यंत गाजली. दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्सने देखील किंग्स इलेव्हन पंजाबच्या धावडोंगरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही सामन्यात किंग्स इलेव्हन संघ भीती घालवून खेळत असल्याने या संघाकडे आजच्या स्थितीत पात्रता गाठण्याची संधी कायम आहे. दिल्लीबाबत असेच घडले. दिल्लीने आधीचे सामने गमविल्याचा फटका त्यांना बसलाच आहे. पण राहिलेल्या सामन्यात खेळताना ‘गमविण्यासारखे काहीच नाही’ या निर्धाराने संघ बिनधास्त खेळ करीत आहे. टी-२० प्रकारात याच निर्धाराची गरज असते.गत चॅम्पियन सनरायजर्सने स्वत:ला सावरले. गुजरात लायन्सविरुद्ध विजय मिळविल्यास प्ले आॅफसाठी पात्रता गाठता येईल, याची संघाला जाणीव आहे. कानपूरच्या ग्रीनपार्कची खेळपट्टी जलद स्वरुपाची आहे. येथे चेंडू झटपट बॅटवर येतो. त्यातच आऊटफिल्ड जलद असल्याने मारलेल्या फटक्यांवर चार धावा मिळण्यास मदत होते. हैदराबाद संघ वॉर्नर आणि धवन यांच्याकडून पुन्हा एकदा झकास सुरुवात मिळावी, अशी आशा बाळगत असावा. पण काढलेल्या धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीतही काळजी घ्यावी लागेल. उपलब्ध पर्यायांचा शिताफीने वापर करण्याची गरज आहे. मोझेस हेन्रिक्स फलंदाजीत तर यशस्वी ठरला पण त्याचा मारा तितकासा प्रभावी दिसत नाही. तो गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी फलंदाज चांगली फटकेबाजी करताना दिसतात.कोलकाता येथे केकेआर आणि मुंबई हे विजयाच्या जिद्दीने खेळताना दिसतील. या लढतीत सुनील नारायणवर मुंबई संघ फलंदाजी-गोलंदाजीत कसा आवर घालतो हे निर्णायक ठरणार आहे. ख्रिस लीनसोबत गौतम गंभीर सलामीला येऊ शकतो. उथप्पा, पांडे आणि युसूफ यांना देखील आपापली जबाबदारी ओळखून योगदान द्यावे लागेल. मुंबईने हातातोंडाशी आलेले काही विजय घालविले. त्यामुळेच अखेरची लढत जिंकण्याला महत्त्व असेल. विजयामुळे आत्मविश्वास परत येईलच, शिवाय गुणतालिकेत नंबर वनसह अव्वल स्थानावर देखील कायम राहता येईल. (पीएमजी)