शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तरुण खेळाडूंवर विश्वास

By admin | Updated: December 5, 2014 00:56 IST

कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आर. आश्विन, रवींद्र जडेजा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून आपले स्थान पक्के केले आहे.

मुंबई : २०१५च्या विश्वचषक स्पर्धेसाठी गुरुवारी निवडण्यात आलेल्या भारताच्या संभाव्य ३० जणांच्या संघात वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, गौतम गंभीर, झहीर खान आणि हरभजनसिंग या सिनीअर खेळांडूना स्थान देण्यात आलेले नाही. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडण्यात आलेल्या या संभाव्य संघात तरुण खेळाडूंवरच विश्वास दाखविला आहे. २०११च्या विश्वचषक विजयात सेहवाग, गंभीर व युवराज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर या संघात हरभजन आणि झहीर यांचाही समावेश होता. मात्र, गेल्या वर्षभरातील त्यांच्या कामगिरीवर लक्ष टाकल्यास त्यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता धूसरच होती. विशेषत: हे पाचही जण गेल्या वर्षभरापासून वन डे संघात खेळलेलेच नाहीत. याव्यतिरिक्त जलदगती गोलंदाज आशिष नेहरा व मुनाफ पटेल, फिरकीपटू पियूष चावला आणि अष्टपैलू युसूफ पठाण यांनाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बाहेरच ठेवण्यात धन्यता मानली आहे. २०११च्या विश्वचषक विजेत्या संघापैकी अनेकांना खराब कामगिरीमुळे डच्चू मिळाला आहे, तर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली आहे आणि एस. श्रीसंत याच्यावर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विश्वविजेत्या संघातील महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, विराट कोहली आणि आर. आश्विन यांची अ‍ॅक्शन पुन्हा पाहायला मिळेल. निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी ही घोषणा केली. जम्मू - काश्मीरचा अष्टपैलू परवेज रसूल, उत्तर प्रदेशचा फिरकीपटू कुलदीप यादव, महाराष्ट्राचा फलंदाज केदार जाधव, मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांना स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण खेळीमुळे संभाव्य संघात स्थान मिळाले. संभाव्य संघात असलेल्या अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी आणि फॉर्मात असलेला फलंदाज मनोज तिवारीसह यष्टीरक्षक संजू सॅमसन यांची अंतिम १५ जणांमध्ये निवड निश्चित मानली जात आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या अंतिम संघाची निवड करण्यात येणार आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आर. आश्विन, रवींद्र जडेजा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून आपले स्थान पक्के केले आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, वरुण अ‍ॅरोन, धवल कुलकर्णी, मोहित शर्मा आणि अशोक दिंडा यांना आंतरराष्ट्रीय व स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या बळावर निवडण्यात आले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)