शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमांच्या बरसातीने विराटपर्वाची सुरुवात

By admin | Updated: January 15, 2017 22:54 IST

भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी झालेला पहिला एकदिवसीय सामना सर्वार्थाने गाजवला तो कर्णधार विराट

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15  - भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी झालेला पहिला एकदिवसीय सामना सर्वार्थाने गाजवला तो कर्णधार विराट कोहली आणि घरच्या मैदानावर खेळत असलेला पुणेकर केदार जाधवने. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर प्रथमच पूर्णवेळ कर्णधार म्हणून संघाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या विराटने पुण्यात विक्रमांची बसरात करत क्रिकेटमधील आपल्या नव्या डावाची दणक्यात सुरुवात केली. विराट आणि भारतीय संघाने या लढतीत नोंदवलेल्या विक्रमांचा संक्षिप्त आढावा..
पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक
विराट कोहलीने याआधी भारताच्या कसोटी संघाचे, तसेच मर्यादित षटकातील संघांचे कर्णधारपद भूषवले होते, पण पूर्णवेळ कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात शतक फटकावण्याची किमया विराटने साधली. त्याने अवध्या 93 चेंडूत शतकी मजल मारली.
धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके ठोकण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
विराट कोहलीची फलंदाजी आव्हानाचा पाठलाग करताना विशेष बहरते. आजही  इंग्लंडने दिलेल्या मोठ्या आव्हानासमोर त्याची फलंदाजी बहरली. त्याने आव्हानाचा पाठलाग करताना आज पुन्हा एकदा शतकी खेळी केली, धावांचा पाठलाग करतानाचे विराटचे हे 17 वे शतक ठरले. त्याबरोबरच धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरने फटकावलेल्या 17 शतकांच्या विक्रमाशीही विराटने बरोबरी साधली.
पाचव्या गड्यासाठी सर्वात मोठी भागीदारी
 351 धावांचा पाठलाग करताना भारताचे चार खंदे फलंदाज झटपट माघारी परतल्यावर विराट कोहलीने केदार जाधवसोबत भारताचा डाव सावरला. विराट आणि केदारने पाचव्या गड्यासाठी 200 धावांची भागीदारी केली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एकदिवसीय सामन्यात पाचव्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ. त्यांनी रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनीने पाचव्या गड्यासाठी केलेल्या 167 धावांच्या भागीदारीचा विक्रम  मोडीत काढला.
आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना चौथी सर्वात मोठी धावसंख्या 
विराट आणि केदारने शानदार शतके फटकावताना केलेल्या  द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने 350 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची किमया साधली. भारताने आज फटकावलेल्या 356 धावा आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना रचलेली चौथी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. याआधी दक्षिण आफ्रिकेने 2006 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध  438, त्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2016 साली दर्बान येथे दुसऱ्या डावात 372 धावा कुटल्या होत्या. तर भारतीय संघाने 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना जयपूर येथे 362 धावा कुटल्या होत्या.