शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

विक्रमांच्या बरसातीने विराटपर्वाची सुरुवात

By admin | Updated: January 15, 2017 22:54 IST

भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी झालेला पहिला एकदिवसीय सामना सर्वार्थाने गाजवला तो कर्णधार विराट

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15  - भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी झालेला पहिला एकदिवसीय सामना सर्वार्थाने गाजवला तो कर्णधार विराट कोहली आणि घरच्या मैदानावर खेळत असलेला पुणेकर केदार जाधवने. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर प्रथमच पूर्णवेळ कर्णधार म्हणून संघाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या विराटने पुण्यात विक्रमांची बसरात करत क्रिकेटमधील आपल्या नव्या डावाची दणक्यात सुरुवात केली. विराट आणि भारतीय संघाने या लढतीत नोंदवलेल्या विक्रमांचा संक्षिप्त आढावा..
पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक
विराट कोहलीने याआधी भारताच्या कसोटी संघाचे, तसेच मर्यादित षटकातील संघांचे कर्णधारपद भूषवले होते, पण पूर्णवेळ कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात शतक फटकावण्याची किमया विराटने साधली. त्याने अवध्या 93 चेंडूत शतकी मजल मारली.
धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके ठोकण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
विराट कोहलीची फलंदाजी आव्हानाचा पाठलाग करताना विशेष बहरते. आजही  इंग्लंडने दिलेल्या मोठ्या आव्हानासमोर त्याची फलंदाजी बहरली. त्याने आव्हानाचा पाठलाग करताना आज पुन्हा एकदा शतकी खेळी केली, धावांचा पाठलाग करतानाचे विराटचे हे 17 वे शतक ठरले. त्याबरोबरच धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरने फटकावलेल्या 17 शतकांच्या विक्रमाशीही विराटने बरोबरी साधली.
पाचव्या गड्यासाठी सर्वात मोठी भागीदारी
 351 धावांचा पाठलाग करताना भारताचे चार खंदे फलंदाज झटपट माघारी परतल्यावर विराट कोहलीने केदार जाधवसोबत भारताचा डाव सावरला. विराट आणि केदारने पाचव्या गड्यासाठी 200 धावांची भागीदारी केली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एकदिवसीय सामन्यात पाचव्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ. त्यांनी रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनीने पाचव्या गड्यासाठी केलेल्या 167 धावांच्या भागीदारीचा विक्रम  मोडीत काढला.
आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना चौथी सर्वात मोठी धावसंख्या 
विराट आणि केदारने शानदार शतके फटकावताना केलेल्या  द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने 350 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची किमया साधली. भारताने आज फटकावलेल्या 356 धावा आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना रचलेली चौथी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. याआधी दक्षिण आफ्रिकेने 2006 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध  438, त्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2016 साली दर्बान येथे दुसऱ्या डावात 372 धावा कुटल्या होत्या. तर भारतीय संघाने 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना जयपूर येथे 362 धावा कुटल्या होत्या.