शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

बीसीसीआयच्या नव्या निवड समितीकडे फक्त १३ कसोटी सामन्यांचा अनुभव

By admin | Updated: September 22, 2016 09:04 IST

बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील एकूण २९ कसोटी आणि ४५ एकदिवसीय सामने खेळले होते.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २२ - बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील एकूण २९ कसोटी आणि ४५ एकदिवसीय सामने खेळले होते. ज्यूनियर निवड समितीचे प्रमुख वेंकटेश प्रसाद यांच्याकडे ३३ कसोटी आणि १६१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. 
 
त्यातुलनेत निवड समितीच्या नवीन पाच सदस्यांनी एकत्र मिळून फक्त १३ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.  निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद सहा कसोटी आणि १७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांचे सहकारी देवांग गांधी ( ४ कसोटी, ३ एकदिवसीय), शरणदीप सिंग (३ कसोटी, ५ एकदिवसीय), गगन खोडा (२ एकदिवसीय) आणि जतीन परांजपे (४ एकदिवसीय)  यांच्याकडे इतक्याच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने निवड समितीमध्ये फक्त तीन सदस्य असावे अशी शिफारस केली होती. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय संघ निवडण्यासाठी बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतका मर्यादीत अनुभव असलेल्या समितीची निवड कशी केली असा प्रश्न पडतो. 
 
वाद टाळण्यासाठी कठोर निकषांचे पालन करुन नव्या सदस्यांची निवड केल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. नव्या निकषानुसार निवड समितीचा सदस्य पाचवर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला असला पाहिजे. कुठल्याही आयपीएल संघाशी तो संबंधित नसावा तसेच त्याची स्वत:ची प्रशिक्षण अकादमी नसावी. बीसीसीआयला ९० पेक्षा जास्त अर्ज मिळाले पण त्यात ओळख मिळवलेल्या नावांची संख्या कमी होती. प्रसाद आणि खोडा यापूर्वी निवड समितीच्या पॅनलमध्ये होते.