शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘बीसीसीआय’ने कोहलीला फटकारले

By admin | Updated: March 5, 2015 23:25 IST

एका राष्ट्रीय दैनिकाच्या पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्टार फलंदाज विराट कोहली याची चांगलीच कानउघाडणी केली आहे़

पत्रकार शिवीगाळ प्रकरण : अशा घटनांची पुनरावृत्ती न करण्याचाही इशारा पर्थ : एका राष्ट्रीय दैनिकाच्या पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्टार फलंदाज विराट कोहली याची चांगलीच कानउघाडणी केली आहे़ अशा घटनेची पुनरावृत्ती होता काम नये, असा इशारा मंडळाने या खेळाडूला दिला आहे़ ‘बीसीसीआय’चे नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर म्हणाले की, कोहलीला टीम इंडियाचा सन्मान राखण्याची ताकीद देण्यात आली आहे़ तसेच भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेण्याचेही सांगण्यात आले आहे़ केवळ कोहलीलाच नव्हे, तर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने यापुढे जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे़ दरम्यान, एक दिवस आधी भारतीय संघ व्यवस्थापनाने या प्रकरणाला जास्त महत्त्व दिले नव्हते आणि कोहलीने सदर पत्रकाराला शिवीगाळ केलीच नाही, असा पवित्रा घेतला होता़ यानंतर पत्रकाराने कोहलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) तक्रार केली होती़ठाकूर पुढे म्हणाले की, बीसीसीआय क्रिकेटला कव्हरेज देणाऱ्या आणि या खेळाला लोकप्रिय बनविणाऱ्या मीडियाचा सन्मान करते़ मात्र, आता या प्रकरणाला जास्त न वाढविता दोन्ही पक्षांनी सर्व काही विसरून वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे़दरम्यान, या राष्ट्रीय दैनिकाने आता वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे़ या दैनिकाचे संपादक म्हणाले की, भारताचे वर्ल्डकपमधील अभियान बघता आम्ही हा वाद इथेच मिटविण्याचा निर्णय घेतला आहे़ आम्हाला नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी बरेच सहकार्य केले आहे़ याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो़ विराटचा मंगळवारी तोल सुटला. सराव सत्र आटोपल्यानंतर समोर दिसलेल्या पत्रकाराला पाहून त्याने थेट शिवराळ भाषा वापरण्यास सुरुवात केली. अनुष्का शर्माविषयी एका राष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरून कोहली नाराज होता. याच पत्रकाराने हे वृत्त दिल्याचा त्याचा गैरसमज झाला होता़ (वृत्तसंस्था)वाद मिटवा-गावसकर, लक्ष्मणचे आवाहनभारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने एका राष्ट्रीय दैनिकाच्या पत्रकाराला दिलेल्या शिवीगाळप्रकरणी वाद आता संपुष्टात आणावा, असे आवाहन भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर आणि व्ही़ व्ही़ एस़ लक्ष्मण यांनी केले आहे़ गावसकर म्हणाला की, एखाद्या खेळाडूने यशाच्या शिखरावर असताना असे वर्तन करणे शोभनीय नाही़ त्यामुळे यापुढेही या स्टार खेळाडूने मीडियाशी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे़ हे प्रकरण त्वरित मिटविता आले असते़ दरम्यान, लक्ष्मण म्हणाला की, गैरसमजामधून हा प्रकार घडला होता़ यानंतर कोहलीने या पत्रकाराची माफी मागितली आहे़त्यामुळे हा वाद जास्त न वाढविता त्वरित संपुष्टात आणायला हवा आणि खेळाडूंनी वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित करावे़