शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

बीसीसीआयला ‘फायनल वॉर्निंग’

By admin | Updated: October 7, 2016 02:50 IST

निवृत्त न्या. आर. एम. लोढ समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर भूमिका घेताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २४ तासांचा अंतिम वेळ

नवी दिल्ली : निवृत्त न्या. आर. एम. लोढ समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर भूमिका घेताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २४ तासांचा अंतिम वेळ दिला आहे. त्याच वेळी, जर का बीसीसीआयने लोढा शिफारशी लागू करण्यास मनाई केली, तर त्यानंतर न्यायालय आदेश देईल, की बोर्डाच्या सर्व विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या जागी प्रशासकांच्या समितीची नियुक्ती व्हावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने खडसावले.त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे वकील कपिल सिब्बल यांनाही बोर्डासह चर्चा करून शुक्रवारपर्यंत आपले उत्तर देण्यास सांगितले. दरम्यान, सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याप्रकरणी काही वेळ मागितला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली, अशी माहितीची या वेळी मिळाली.क्रिकेटविश्वातील सर्वांत श्रीमंत संघटना असलेल्या बीसीसीआयला या वेळी सर्वोच्च न्यायालयाने थेट फटकारताना विचारले, की ‘तुम्ही लोढा समितीच्या शिफारशी लागू करणार आहात की नाही?’ सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी करताना सांगितले, की ‘तुम्ही वेळेचा अपव्यय करणे बंद करा. एक वचनपत्र द्या, की तुम्ही लोढा समितीच्या शिफारशी लागू करणार आहात. नाही तर आम्हाला नाइलाजाने आदेश द्यावा लागेल.’त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला आपल्या राज्य संघटनांना पैसे न देण्याबाबतही निर्देश केले आहेत. लोढा समितीच्या या शिफारशीलाही बीसीसीआयने विरोध केला होता. याबाबत ठाकूर म्हणाले, ‘‘ज्या राज्य संघटना सुधारण्यास तयार नाहीत, त्यांना पैसे दिले जाऊ नयेत. त्यांना पैशांची मागणी करण्याचा अधिकार नाही. तसेही तुम्हाला पैसे देण्याबाबत चर्चा करण्याची इतकी घाई का आहे?’’ तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना बीसीसीआयचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले होते, की बीसीसीआयने समितीच्या शिफारशी मान्य करण्याचे कधीच टाळले नाही. (वृत्तसंस्था)कोणत्याही अटीशिवाय लोढा शिफारशी लागू करण्याबाबतचे वचनपत्र त्यांनी न्यायालयाकडे द्यावे. नाही तर यानंतर न्यायालय आपला आदेश जाहीर करेल. ठाकूर म्हणाले, ‘‘जर बीसीसीआय वचनपत्र देण्यास कोणती टाळाटाळ करीत असेल, तर न्यायालय शुक्रवारी आपला आदेश देईल.- टी. एस. ठाकूर, सरन्यायाधीश गेल्याच आठवड्यात लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थिती अहवाल सादर करताना बीसीसीआयविरुद्ध आरोप केले होते, की बोर्ड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पलन करीत नसून बोर्डामध्ये कोणतीही सुधारणा करीत नाही. शिवाय समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यासही बीसीसीआय टाळाटाळ करीत आहे.बीसीसीआयचे म्हणणे असे आहे, की लोढा समितीच्या शिफारशी भारतीय क्रिकेटसाठी योग्य नसून त्यामुळे क्रिकेट बोर्ड पूर्णपणे कमजोर होईल. त्याच वेळी दुसरीकडे, लोढा समितीने सांगितले, की या शिफारशी बीसीसीआयला पारदर्शी करण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या.सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडताना, लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यास आम्ही कधीही टाळाटाळ केली नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.बीसीसीआयच्या सर्व सदस्यांची बैठक झाली होती. या वेळी अनेक शिफारशींचा वोटिंगद्वारे विरोध झाला होता. लोढा समितीला पाठविलेल्या सर्व ४० ई-मेलची माहिती न्यायालयाला दिली जाईल. तसेच, आम्ही समितीच्या ई-मेलना कोणतेही उत्तर दिले नसल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे.- कपिल सिब्बल,बीसीसीआयचे वकील