शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
4
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
5
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
6
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
7
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
8
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
9
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
10
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
11
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
12
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
13
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
14
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
15
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
16
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
17
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
19
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या इशाऱ्यावर नाचते बीसीसीआय

By admin | Updated: October 28, 2015 22:25 IST

बीसीसीआय सरकारच्या इशाऱ्यांवर चालणारे बोर्ड असून, राज्यकर्त्यांच्या परवानगीनंतरच भारतीय क्रिकेटचे सर्व निर्णय घेतले जात असल्याची टीका पाकचा माजी कर्णधार जावेद मियॉँदाद याने केली आहे.

लाहोर : बीसीसीआय सरकारच्या इशाऱ्यांवर चालणारे बोर्ड असून, राज्यकर्त्यांच्या परवानगीनंतरच भारतीय क्रिकेटचे सर्व निर्णय घेतले जात असल्याची टीका पाकचा माजी कर्णधार जावेद मियॉँदाद याने केली आहे.भारत- पाकदरम्यान द्विपक्षीय मालिका पूर्ववत करण्यासंदर्भात बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेवर मियॉँदाद नाराज आहेत. बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांच्या अलीकडच्या वक्तव्याचा संदर्भ देत मियॉँदाद म्हणाले, की बीसीसीआय सरकारच्या इशाऱ्यावर नाचते. खरेतर याला क्रिकेट बोर्ड नव्हे, सरकारी बोर्ड संबोधायला हवे. अन्य क्रिकेट बोर्डांसोबत भारताची वागणूक खराब आहे. ही बीसीसीआयच्या पतनाची सुरुवात आहे. पीसीबी प्रमुख शहरयार खान अलीकडेच भारत दौऱ्यावर आले. त्यांना बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासोबत मालिकेसंदर्भात चर्चा करायची होती, पण शिवसैनिकांनी राडा केल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागले. नंतर सद्य:स्थितीत मालिका आयोजन होणे नाही, असे वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी केले. ५८ वर्षांच्या मियॉँदादने भारत, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांनी जागतिक क्रिकेटवर प्रभुत्व गाजविल्याबद्दल टीका केली. इंग्लंड- आॅस्ट्रेलियात सातत्याने अ‍ॅशेसचे आयोजन होते, तर भारत- पाक मालिका का होऊ नये, पाकसोबत पराभवाच्या भीतीमुळेच भारत खेळत नसल्याचा आरोपही मियॉँदादने केला.(वृत्तसंस्था)