शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

विजयाचे श्रेय फलंदाजांना : विराट

By admin | Updated: April 14, 2016 02:55 IST

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४५ धावांनी मिळालेल्या विजयाचे श्रेय फलंदाजांना दिले.

बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४५ धावांनी मिळालेल्या विजयाचे श्रेय फलंदाजांना दिले.सामन्यानंतर विराट म्हणाला, ‘‘आम्ही नाणेफेक गमावली होती आणि आम्हाला येथे वेगवान सुरुवात हवी होती. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती आणि त्या खेळपट्टीवर जास्तीत जास्त धावा करण्याचा आमचा इरादा होता. ख्रिस गेल प्रारंभीच बाद झाला होता आणि धावगती उंचावण्याची जबाबदारी माझ्यावर आणि अ‍ॅबी डिव्हिलियर्सवर होती. आमच्या दोघांदरम्यान चांगली भागीदारी होऊ शकली, याचा मला आनंद आहे. मी आणि डिव्हिलियर्सने गेल्या वर्षीही मुंबईत चांगली भागीदारी केली होती आणि आम्ही येथे पुन्हा आपल्या खेळीला मजबुती देऊ शकलो. डिव्हिलियर्सने लाजवाब फलंदाजी केली आणि सुरुवातीला नजर बसल्यानंतर मनाप्रमाणे धावा लुटल्या. मी शानदार पद्धतीने चेंडू फटकावत होतो आणि आमच्या भागीदारीने संघाचा मजबूत धावसंख्येचा पाया रचला गेला.’’विराट म्हणाला, ‘‘हैदराबाद संघाने पोषक खेळपट्टीवर विजयी लक्ष्याचा जोरदार पाठलाग केला; परंतु लक्ष्य खूप मोठे होते आणि अखेर आमचे गोलंदाज त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरले.’’सामनावीर डिव्हिलियर्स म्हणाला, ‘‘मला येथे खेळणे नेहमीच आवडते आणि जेव्हा दुसऱ्या एंडकडून विराटसारखा सहकारी असेल तेव्हा तुम्हाला मोकळेपणाने खेळण्याची संधी असते. मी नेहमीप्रमाणेच येथे फलंदाजीचा आनंद लुटला आणि विराटसोबत मोठी भागीदारी करण्यात यशस्वी ठरलो. आमच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांवर नियंत्रण ठेवताना आम्हाला शानदार विजय मिळवून दिला.’’ (वृत्तसंस्था)