शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

फलंदाजांची शरणागती, भारत सर्व बाद २००

By admin | Updated: January 30, 2015 12:44 IST

सलामीवीर अजिंक्य रहाणे दमदार ७१ धावांची खेळी वगळता उर्वरित भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारल्याने इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यात भारताने सर्व गडी गमावत अवघ्या २०० धावा केल्या.

ऑनलाइन लोकमत 
पर्थ, दि. ३० - सलामीवीर अजिंक्य रहाणे दमदार ७१ धावांची खेळी वगळता उर्वरित भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारल्याने इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यात भारताने सर्व गडी गमावत अवघ्या २०० धावा केल्या आहेत. भारताच्या सहा फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आलेली नाही. 
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत शुक्रवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पर्थ येथे वन डे सामना सुरु आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन ही जोडी सलामीला उतरली. दोघांनी सावध सुरुवात करत भारताला अर्धशतकी सलामी केली. शिखर धवन ३८ धावांवर असताना ख्रिस वॉक्सने त्याचा अडसर दूर केला. गेल्या काही सामन्यांपासून शिखर धवन अपयशी ठरला असून आज चांगली सुरुवात करुनही त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात त्याला अपयश आले. शिखर धवन बाद झाला तेव्हा भारत १ बाद ८३ धावा अशा स्थितीत होता. मात्र त्यानंतर भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. अजिंक्य रहाणे एका बाजूने नेटाने किल्ला लढवत असताना अन्य फलंदाजांना त्याला अपेक्षीत साथ दिली नाही. विराट कोहली ८ धावा, सुरेश रैना एक धावा, अंबाटी रायडू १२ धावा, कर्णधार महेंद्रसिंग धोनी १७ धावा, स्टुअर्ट बिन्नी ७ धावा, रविंद्र जडेजा ५ धावा आणि अक्षर पटेल १ धावांवर बाद झाला. त्यामुळे १ बाद ८३ धावा अशा स्थितीत असलेल्या भारताची अवस्था ९ बाद १६५ झाली. भारताचे आठ फलंदाज फक्त ८२ धावांमध्येच तंबूत परतले. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा या तळाच्या जोडीने ३५ धावांची भागीदारी करत भारताला दोनशेचा टप्पा गाठून दिला. 
इंग्लंडतर्फे स्टिव्हन फिनने ३ तर ख्रिस वॉक्स, स्टुअर्ट ब्रॉड, मोईन अली यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जेम्स अँडरसनने एक विकेट घेतली.