शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

बाल उत्कर्ष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : महिंद्रा-महात्मा गांधी या संघाना जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 19:48 IST

तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत हेच दोन संघ विजेते ठरले होते. महिंद्राचा आनंद पाटील आणि महात्मा गांधींची पूजा किणी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. 

ठळक मुद्देमहिलांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी संघाने संघर्षाचा दुबळा प्रतिकार ३६-१८असा संपुष्टात आणत बाल उत्कर्ष चषक आपल्या नावे केले.

मुंबई : महिंद्रा आणि महात्मा गांधी या संघांनी बाल उत्कर्ष क्रीडा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे अजिंक्यपद मिळविले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत हेच दोन संघ विजेते ठरले होते. महिंद्राचा आनंद पाटील आणि महात्मा गांधींची पूजा किणी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. 

मुंबई, लालबाग येथील गणेश गल्ली मैदानावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महिंद्राने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी एअर इंडियाचे आव्हान ३९-२३असे सहज परतवीत बाल उत्कर्ष चषक पटकावला. सुरुवाती पासून आक्रमक खेळ करत मध्यांतराला २३-१० अशी घेणाऱ्या महिंद्राने नंतर देखील एअर इंडियाला जवळपास येण्याची संधी दिली नाही. आनंद पाटील, अजिंक्य पवार यांना थोपविणे एअर इंडियाला जमले नाही. तसेच महिंद्राने क्षेत्ररक्षण भेदणे एअर इंडियाच्या चढाईपट्टूना जड जात होते. महिंद्राच्या स्वप्नील शिंदेचा बचाव उत्तम होता. एअर इंडियाच्या उमेश म्हात्रे, आशिष मोहिते यांना या सामन्यात सूर सापडला नाही.

       महिलांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधीने संघर्षाचा दुबळा प्रतिकार ३६-१८असा संपुष्टात आणत बाल उत्कर्ष चषक आपल्या नावे केले. नुकत्याच झालेल्या महापौर चषकावर आपले नाव कोरल्याने उत्साह द्विगुणित झालेल्या महात्माने त्याच आत्मविश्वासाने खेळ करीत हा सामना सहज खिशात टाकला. उत्तरार्धात जोरदार खेळ करीत २०-१०अशी आघाडी घेणाऱ्या महात्माने उत्तरार्धात त्याच तडफेने खेळ करी हा सामना १८गुणाने जिंकला. पूजा किणी,सायली जाधव यांच्या झंजावाती चढायांना संघर्षकडे उत्तर नव्हते. तसेच सृष्टी चाळके, तेजस्वी पाटेकर यांच्या अभेद्य क्षेत्ररक्षण भेदून कोमल देवकर, निखिता यांना गुण मिळविणे जमत नव्हते.पूजा जाधव, दीपा बुर्ते यांचा बचाव देखील दुबळा ठरला.

टॅग्स :Kabaddiकबड्डी