शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

बाल उत्कर्ष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : महिंद्रा-महात्मा गांधी या संघाना जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 19:48 IST

तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत हेच दोन संघ विजेते ठरले होते. महिंद्राचा आनंद पाटील आणि महात्मा गांधींची पूजा किणी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. 

ठळक मुद्देमहिलांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी संघाने संघर्षाचा दुबळा प्रतिकार ३६-१८असा संपुष्टात आणत बाल उत्कर्ष चषक आपल्या नावे केले.

मुंबई : महिंद्रा आणि महात्मा गांधी या संघांनी बाल उत्कर्ष क्रीडा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे अजिंक्यपद मिळविले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत हेच दोन संघ विजेते ठरले होते. महिंद्राचा आनंद पाटील आणि महात्मा गांधींची पूजा किणी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. 

मुंबई, लालबाग येथील गणेश गल्ली मैदानावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महिंद्राने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी एअर इंडियाचे आव्हान ३९-२३असे सहज परतवीत बाल उत्कर्ष चषक पटकावला. सुरुवाती पासून आक्रमक खेळ करत मध्यांतराला २३-१० अशी घेणाऱ्या महिंद्राने नंतर देखील एअर इंडियाला जवळपास येण्याची संधी दिली नाही. आनंद पाटील, अजिंक्य पवार यांना थोपविणे एअर इंडियाला जमले नाही. तसेच महिंद्राने क्षेत्ररक्षण भेदणे एअर इंडियाच्या चढाईपट्टूना जड जात होते. महिंद्राच्या स्वप्नील शिंदेचा बचाव उत्तम होता. एअर इंडियाच्या उमेश म्हात्रे, आशिष मोहिते यांना या सामन्यात सूर सापडला नाही.

       महिलांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधीने संघर्षाचा दुबळा प्रतिकार ३६-१८असा संपुष्टात आणत बाल उत्कर्ष चषक आपल्या नावे केले. नुकत्याच झालेल्या महापौर चषकावर आपले नाव कोरल्याने उत्साह द्विगुणित झालेल्या महात्माने त्याच आत्मविश्वासाने खेळ करीत हा सामना सहज खिशात टाकला. उत्तरार्धात जोरदार खेळ करीत २०-१०अशी आघाडी घेणाऱ्या महात्माने उत्तरार्धात त्याच तडफेने खेळ करी हा सामना १८गुणाने जिंकला. पूजा किणी,सायली जाधव यांच्या झंजावाती चढायांना संघर्षकडे उत्तर नव्हते. तसेच सृष्टी चाळके, तेजस्वी पाटेकर यांच्या अभेद्य क्षेत्ररक्षण भेदून कोमल देवकर, निखिता यांना गुण मिळविणे जमत नव्हते.पूजा जाधव, दीपा बुर्ते यांचा बचाव देखील दुबळा ठरला.

टॅग्स :Kabaddiकबड्डी