शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

‘अझलन शाह’मध्ये भारताची कॅनडावर २ गोलने मात

By admin | Updated: April 10, 2015 08:38 IST

विजेतेपदाच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या भारतीय संघाने आपल्यापेक्षा कमी रँकिंग असणाऱ्या कॅनडाला पराभूत करण्यासाठी चांगलीच

इपोह (मलेशिया) : विजेतेपदाच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या भारतीय संघाने आपल्यापेक्षा कमी रँकिंग असणाऱ्या कॅनडाला पराभूत करण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागली आणि आज येथे २४ व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत त्यांचा ५-३ गोलने पराभव करीत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.भारताकडून रूपिंदर पालसिंह (१३ वे मिनीट) आणि व्ही. आर. रघुनाथ (३२ वे मिनीट) यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल केले, तर रमणदीपसिंहने ४६ आणि ४७ व्या मिनिटाला मैदानी गोल केला. त्यानंतर सतबीरसिंहने ४९ व्या मिनिटाला आणखी एक गोल करीत भारताच्या गोलची संख्या पाचवर पोहोचवली.जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असणाऱ्या कॅनडाकडून ओलिव्हर शोलफिल्डने ४३ व्या, जगदीश गिलने ४९ व्या आणि डेव्हिड जेम्सन याने ५२ व्या मिनिटाला गोल केले. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱ्या भारताने चेंडूवर चांगले नियंत्रण ठेवले; परंतु त्यांची कामगिरी तेवढी प्रभावी नव्हती.नेहमीप्रमाणे याही सामन्यात भारतीय खेळाडूंनी अनेकदा गोल करण्याची संधी दवडली आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला गोल करणे सोपे गेले. कॅनडाने ४३ व्या मिनिटाला वेगवान रिव्हर्स हिटने गोल करताना भारतीय संघाला धक्का दिला. त्याचे भारतीय गोलरक्षक श्रीजेश रवींद्रनजवळ उत्तर नव्हते.सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला गिलने पेनल्टी कॉर्नरवर कॅनडासाठी दुसरा गोल केला, तर जेम्सनने ५२ व्या मिनिटाला कॅनडासाठी तिसरा गोल केला. भारत आता शनिवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध या स्पर्धेतील सर्वांत कठीण लढत खेळेल. भारताने चार लढतीत एक विजय, एक ड्रॉसह चार गुण मिळवले. त्यामुळे हा संघ रविवारी होणाऱ्या फायनलच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. (वृत्तसंस्था)