शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

पद्माकर शिवलकरांना पुरस्कार प्रदान

By admin | Updated: March 10, 2017 06:22 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि स्टार फिरकी गोलंदाक रविचंद्रन आश्विन यांना २०१५-१६ मोसमातील शानदार कामगिरीच्या प्रदर्शनासाठी भारतीय

बंगळुरु : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि स्टार फिरकी गोलंदाक रविचंद्रन आश्विन यांना २०१५-१६ मोसमातील शानदार कामगिरीच्या प्रदर्शनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरविले. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी पॉली उम्रीगर पुरस्कार कोहलीला प्रदान करण्यात आला. या वेळी माजी दिग्गज क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांना भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या हस्ते सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, कोहलीने तिसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले असून, अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यात केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर आश्विनने प्रतिष्ठेचा दिलीप सरदेसाई पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवल्यानंतर कोहली म्हणाला की, ‘मी सुरुवातीपासूनच सर्वोत्तम क्रिकेटपटू बनण्याच्या प्रयत्नात होतो. यासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल, याची मला जाणीव होती. यासाठी तिन्ही क्रिकेटसाठी उपलब्ध राहणे आणि देशाच्या संघाला पुढे नेणे महत्त्वपूर्ण ठरले आहे.’दरम्यान, या वेळी कोहलीने आपल्या टीकाकारांनाही गप्प केले. त्याने म्हटले की, ‘माझ्या कारकिर्दीमध्ये अनेक व्यक्ती अशा होते, ज्यांना माझ्या क्षमतेवर शंका होती. इतकेच नाही, तर आताही माझ्या कामगिरीवर शंका घेणाऱ्यांची आणि माझा विरोध करण्याऱ्यांची संख्या कमी नाही. पण, असे असले तरी एक गोष्ट नक्की आहे की, मला माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता आणि आहे.’(वृत्तसंस्था)मुंबईकडून रहाणेने स्वीकारला पुरस्कारगेल्यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्चस्व राखलेल्या आणि विक्रमी ४१व्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) सर्वोत्कृष्ट राज्य संघटनेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी भारताचा भरवशाचा फलंदाज आणि मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणे याने एमसीएच्या वतीने हा पुरस्कार माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांच्याहस्ते स्वीकारला. मुंबई, महाराष्ट्राची छापदेशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या मुंबईच्या श्रेयस अय्यरला रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा काढल्याबद्दल माधवराव शिंदे चषक प्रदान करण्यात आला. मुंबईचा सलामीवीर जय बिस्त यालाही २३वर्षांखालील सीके नायडू स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्यासाठी एम. ए. चिदंबरम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचा गोलंदाज सत्यजित बच्चाव याने २३ वर्षांखालील सीके नायडू सर्वाधिक बळी घेत एम. ए. चिदंबरम चषक पटकावला.