शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावात आटोपला

By admin | Updated: March 25, 2017 19:31 IST

पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले.

ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 25 - पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले. अन्य गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावल्याने  भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर संपुष्टात आला. 
 
ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने (111) कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवत शतक झळकावले. त्याची आणि मॅथ्यू वेडची (57) अर्धशतकी खेळी वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. डेव्हीड वॉर्नर, मॅक्सवेल, हँडस्काँब, कमिन्सचे महत्त्वाचे विकेट यादवला मिळाले. उमेश यादव दोन तर, अश्विन, जाडेजा, भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक विकेट घेतला. 
 
ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. रेनशॉच्या रुपाने 10 धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लवकर बसला. अवघ्या 1 धावावर उमेश यादवच्या रेनशॉच्या यष्टया वाकवल्या. पण त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (56) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी दुस-या विकेटसाठी134 धावांची भागीदारी केली.
 
हे दोघे फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारेल असे चित्र होते. पण स्मिथ आणि वॉर्नरची जमलेली जोडी कसोटी पदार्पण करणा-या कुलदीप यादवने फोडली. त्याने वॉर्नरला (56) धावांवर कर्णधार रहाणेकडे झले द्यायला भाग पाडले. वॉर्नर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला गळती लागली. मार्श (4), हँडस्काँब (8)आणि मॅक्सवेल (8) स्वस्तात माघारी परतले. कर्णधार स्मिथने एकबाजू लावून धरली मात्र तो 111 धावांवर आऊट झाला. 
 
चार सामन्यांच्या मालिकेचा निकाल ठरविणा-या निर्णायक कसोटी सामन्याआधीच विराट कोहली खेळणार नसल्याने भारताला खूप मोठा धक्का बसला. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला आराम देण्यात आला आहे. विराट कोहली खेळणार नसल्याने उप कर्णधार अजिंक्य रहाणेकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान विराट कोहलीऐवजी भारतीय संघात गोलंदाज कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. या सामन्यातून कुलदीप यादव पदार्पण केले. 
 
मैदानी आणि शाब्दिक चकमकीने गाजलेली ही मालिका अद्याप १-१ अशी बरोबरीत असली तरी मालिका जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आसुसला आहे. कर्णधार विराट कोहली खेळणार नसल्याने जिंकण्याचे दडपण पाहुण्यांच्या तुलनेत यजमानांवर अधिक जाणवणार आहे.
 
सामन्याच्या पूर्वसंध्येलाच कोहलीने आपण चौथा कसोटी सामना खेळणार नसल्याचे संकेत दिले होते. कोहलीने नेटवर सराव केला पण फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हेच माझ्या खेळण्याचा निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले होते. तथापि सामन्याआधी प्रतिस्पर्धी संघाला मानसिक बळ मिळू नये यासाठी विराट पत्रकारांपुढे देखील हजार झाला होता. नेटस्वर कसे वाटत होते असा सवाल करताना कोहली म्हणाला, ‘मुव्हमेंट वाढली की थोडे दुखणे उमळते. आज सायंकाळी किंवा उद्या सामन्याआधी निर्णय होईल. जोखीम पत्करणे धोकादायक ठरेल काय याचे उत्तर फिजिओ देतील. फिटनेसमध्ये पास झालो तर खेळेन’ असं विराट बोलला होता. 
 
तिसरा सामना अनिर्णीत राखल्याने स्टीव्ह स्मिथ आणि सहकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. दुसरीकडे भारतही कसलीही कसर शिल्लक न राखता विजयाच्या इराद्यानेच उतरणार आहे.
 
लोकेश राहुलकडून चांगली सुरुवात अपेक्षित असून दोन महिन्यांआधी तिहेरी शतक ठोकणाऱ्या करुण नायरकडून मोठ्या अपेक्षा आहेत. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांच्याकडून शांतचित्त आणि कौशल्यपूर्ण फलंदाजी अपेक्षित असेल. कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेचे नेतृत्व पणाला लागलेले असेल. ऑस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णीत राखला तरी त्यांचा नैतिक विजय होईल. सामना जिंकलाच तर त्यांच्यासाठी अ‍ॅशेसपेक्षा हा मोठा विजय ठरणार आहे.
 
हा संघ भारतात दाखल झाला तेव्हा आतापर्यंतचा सर्वांत कमकुवत संघ अशी गणना करण्यात आली. पण पहिलाच सामना जिंकल्याने चित्र बदलले.