शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

‘पंच’तारांकित विजयासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज

By admin | Updated: February 14, 2015 18:20 IST

विश्‍वचषक स्पर्धेच्या प्रारंभी वेस्ट इंडीज संघाने क्रिकेटवर अधिराज्य गाजविले, पण सत्ता आणि संपत्ती सदासर्वकाळ टिकत नसते याची प्रचिती क्रिकेटमध्येही आली.

विश्‍वास चरणकर, कोल्हापूर
विश्‍वचषक स्पर्धेच्या प्रारंभी वेस्ट इंडीज संघाने क्रिकेटवर अधिराज्य गाजविले, पण सत्ता आणि संपत्ती सदासर्वकाळ टिकत नसते याची प्रचिती क्रिकेटमध्येही आली. नव्वदीच्या दशकानंतर क्रिकेटमध्ये ऑन दि फिल्ड आणि ऑफ दि फिल्ड बरीच उलथापालथ झाली. पण या सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे वेस्ट इंडिजची सद्दी संपून ऑस्ट्रेलिया नवा सम्राट म्हणून उदयास आला. १९८७ला त्यांनी पहिला विश्‍वचषक जिंकला. त्यानंतरच्या सहा वर्ल्डकपपैकी तीन वर्ल्डकप त्यांनी जिंकले. सर्वाधिक चारवेळ विश्‍वचषक जिंकणारा संघ म्हणून त्यांचा दबदबा आहे. 
१९७५ च्या पहिल्या विश्‍वचषकात ऑस्ट्रेलियाने थेट फायनलपर्यंत धडक मारली, पण वेस्ट इंडीजच्या पोलादी भिंतीपुढे त्यांचेा वादळ शमले. पुढच्या दोन विश्‍वचषकात त्यांना पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले. 
भारत आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त यजमापदाखाली झालेल्या १९८७ चा विश्‍वचषक हा ऑस्ट्रेलियाच्या साम्राज्याची नांदी होती. या स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन पारंपारीक विरोधक फायनलमध्ये आमने-सामने आले. ऑस्ट्रेलियाला २५३ वर गुंडाळून इंग्लंडने सामन्यात वर्चस्व निर्माण केले, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ५0 षटकात ८ बाद २४६ पर्यंत इंग्लंडला रोखून धरले. इंग्लंडचा ८ धावांनी पराभव झाला. अँलन बोर्डरच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच जगज्जेता ठरला. कोलकात्याच्या ईडन गार्डनच्या साक्षीने क्रिकेट जगतात एक नवा राजा राज्य करण्यास अवतरला होता. 
त्यानंतर १९९२ साली इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात पावसाच्या कृपेने पाकिस्तानला एक गुण जास्त मिळाल्यामुळे त्यांना सेमीफायनल गाठता आली नाही. तर १९९६ ला त्यांनी अंतिम फेरी गाठली पण श्रीलंकेने त्यांना पछाडून विश्‍वविजेतेपद जिंकले. १९९९, २00३ आणि २00७ असे सलग तीनवर्षे त्यांनी विश्‍वविजेतेपद मिळविले. म्हणजे सलग १५ वर्षे त्यांच्या डोक्यावर विश्‍वविजेतेपदाचा मुकुट होता. १९९९च्या विश्‍वचषकाची फायनल अक्षरश एकतर्फी झाली. ऑस्ट्रेलियाने पाकला केवळ १३२ धावात रोखले. हे आव्हान कांगारुंनी दोन गड्यांच्या मोबदल्यात २0 षटकातच गाठले. 
या स्पर्धेत भारताने उपांत्यफेरीत त्यांना घरी घालवून त्यांच्या नावापुढे ‘माजी विश्‍वविजेते’ असे विशेषण लावले. यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया हा सर्वात प्रबळ दावेदार आहे. इतिहासातील आकडेवारीवरुन त्यांच्याविषयी हे बोलले जात नाही, तर त्यांच्या संघातील खेळाडूंवर नजर टाकली की हे लक्षात येते. आजच्या ऑस्ट्रेलियन संघात प्रत्येक जागेवर त्यांच्याकडे तीन-तीन पर्याय आहेत. इतकेच नाही तर कर्णधारपदासाठीही त्यांच्याकडे तीन ऑप्शन आहेत. मायकेल क्लार्क फिट होवून संघात आला तर जॉर्ज बेलीला संघात ‘स्लॉट’च उपलब्ध होत नाही. 
आजच्या संघात सलामीवीर अँरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर ही जोडी सर्वात विध्वंसक समजली जाते. पाठोपाठ शेन वॉटसन, मिशेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, बेली/क्लार्क, यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडीन हे सगळेच फार्मात आहेत. आयपीएलचा मिलेनियर ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर त्यांच्याकडे आहे.  अमेरिकेच्या शस्त्रसाठय़ात नसतील तेवढी क्षेपणास्त्रे ऑस्ट्रेलियन गोलंदाजीत आहेत. गेली दोन वर्षे मिशेल जॉन्सन हा जगातील सर्व खेळपट्टयांवर धुमाकूळ घालतोय. त्यात मायदेशातील खेळपट्टय़ा म्हणजे त्यांच्यासाठी ‘सोने पे 
सुहागा.’ जोडीला मायकेल 
स्टार्क, जोश हेजलवूड, झेव्हिअर डोहर्टी, पॅट कमिन्स आणि जेम्स फॉल्कनेर अशी तगडी स्टारकास्ट  विरोधीपक्षाच्या चिंधड्या उडविण्यास सर्मथ आहे. 
बलाढय़ संघ, होमग्राउंड आणि प्रेक्षकांचा पाठिंबा या जोरावर ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्‍वचषक जिंकण्यास सज्ज आहे.
 
च्ऑस्ट्रेलियाने दुसर्‍यांदा विश्‍वचषक जिंकून विंडीजशी बरोबरी केली. २00३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्‍वचषकात त्यांनी अंतिम फेरी गाठली. फायनलमध्ये त्यांची गाठ भारताशी पडली. अंतिम सामन्याच्या  पहिल्या चेंडूपासून ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड घेतली ती शेवटपर्यंत. 
च्रिकी पाँटिंगने उचलेला चषक सौरभ गांगुलीच्या हातात पाहण्याचे भारतीयांचे स्वप्न भंग पावले. २00७ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेला विश्‍वचषक जिंकून ऑस्ट्रेलियाने हॅटट्रिक केली. सलग तीनदा आणि एकूण चार वेळा वर्ल्डकप जिंकणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ आहे. विश्‍वचषकातील त्यांची ही मक्तेदारी भारताने २0११ मध्ये मोडीत काढली.
 
संघ असा.
ऑस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), पॅट क्युमिन्स, झेव्हिएर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अँरोन फिंच, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), जोश हेजलवुड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हीड वॉर्नर, शेन वॉटसन