शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ऑस्ट्रेलियाचे भारताला १६१ धावांचे आव्हान

By admin | Updated: March 27, 2016 21:00 IST

टी- २० वर्ल्डकपमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धावांचे १६१ आव्हान दिले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात सहा बाद १६० धावा केल्या.

ऑनलाइन लोकमत 
मोहाली, दि. २७ -  टी- २० वर्ल्डकपमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धावांचे १६१ आव्हान दिले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात सहा बाद १६० धावा केल्या. 
फलंदाज आरोन फिंचने या सामन्यात सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ३४ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार लगावत ४३ धावा कुटल्या. तर, उस्मान ख्वाजा आणि एरॉन फिंचने पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची सलामी दिली. ख्वाजाला २६ धावांवर नेहराने यष्ठीपाठी धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या ७२ धावा असताना अश्विनच्या गोलंदाजीवर  धोकादायक डेव्हिड वॉर्नर पाच धावांवर यष्टीचीत झाला. ग्लेन मॅक्सवेल ३१ धावांवर बाद झाला.  त्यानंतर गोलंदाज हार्दीक पांड्याने दिला ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का देत जेम्स फॉल्कनर १0 धावांवर बाद केले. 
युवराजने पहिल्याच षटकात कर्णधार स्मिथला अवघ्या दोन धावांवर यष्टीपाठी धोनीकरवी झेलबाद करुन ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर एरॉन फिंचला ४३ धावांवर  हार्दिक पंडयाने शिखर धवनकरवी झेलबाद केले. मॅक्सवेल १३ धावांवर नाबाद असून, त्याची साथ द्यायला धोकादायक शेन वॉटसन मैदानात आला आहे. 
आयसीसी टी-२० वर्ल्डकपची उपांत्यफेरी गाठण्यासाठी भारतीय संघासाठी 'करो या मरो' असलेला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना सुरु झाला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील मोहालीच्या मैदानावर हा सामना होत आहे. 
विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताला पाकिस्तान विरुद्धचा सामना वगळता एकाही सामन्यात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शेवटच्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने रडतखडत विजय मिळवला होता. हा सामना गमावला असता तर, भारतावर आजच्या सामन्यात सरस धावगती राखून विजय मिळवण्याचे दडपण वाढले असते.
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने तीन सामने जिंकून क्लीनस्वीप विजय मिळवला होता. मात्र आजच्या सामन्यात भारतीय खेळाडूंना लौकीकाला साजेशी कामगिरी केली तरच, भारतासाठी उपांत्यफेरीचे दरवाजे उघडू शकतात. भारतासाठी दिलाशाची बाब म्हणजे आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० च्या बारा सामन्यात भारताने आठ विजय मिळवले आहेत.