शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

कुस्ती, फुटबॉलपाठोपाठ नेमबाजीत कोल्हापूर जगाच्या नकाशावर

By संदीप आडनाईक | Updated: August 2, 2024 13:48 IST

जयसिंहराव कुसाळे नेमबाजीचे प्रेरणास्थान : १९५८ पासून खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास

संदीप आडनाईककोल्हापूर : क्रीडानगरी कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर सातत्याने गाजते आहे. कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, हॉकी खेळापाठोपाठ नेमबाजीतही येथील खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत कोल्हापुरचे नाव जगाच्या नकाशावर आणलेले आहे. जिल्ह्यातील राधानगरीचा नेमबाज २८ वर्षीय स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर एअर रायफल नेमबाजीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत कास्यपदक पटकावल्यामुळे नेमबाजीत कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराच रोवला आहे.नेमबाजीत कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर आणण्याचे काम जयसिंहराव कुसाळे यांनी १९५८ मध्ये सर्वप्रथम केले. कुसाळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत दोन हजारांवर नेमबाजांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. जयसिंहराव कुसाळे यांना नेमबाजीतील कामगिरीबद्दल १९७६-७७ आणि पाठोपाठ १९७७-७८ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराचा बहुमान त्यांचे चिरंजीव रमेश यांनाही १९ व्या वर्षी मिळाला. एकाच घरात लागोपाठ दोन वर्षे पितापुत्रांना हा पुरस्कार मिळण्याचे हे अपवादात्मक उदाहरण आहे.

नेमबाजीत कोल्हापूरकर पुढेचनेमबाजीत कोल्हापूरच्या बाळासाहेब पिरजादे, मंझील हकीम, प्रताप इंगळे, ऋतुराज इंगळे, सागर शेळके, राजेंद्र डफळे, संजय पाटील, रवी पाटील, नवनाथ फडतारे, संदीप तरटे, फुलचंद बांगर, मनमित राऊत, कनय्या बाबर, जितेंद्र विभुते, युवराज चौगुले, महादेव गायकवाड, राठोड या नेमबाजांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळविली. १९८२ मध्ये अजित खराडे, शिवराज सुर्वे या नेमबाजांसह रमेश कुसाळे यांनी अमेरिका दौरा केला. १९८२ मध्ये दिल्ली येथील नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही रमेश यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यावर्षी पुन्हा त्यांची निवड ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन येथे झालेल्या १२ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत झाली. २००१ पासून गेली १९ वर्षे ते अजित खराडे, रमेश कुसाळे, प्रमोद पाटील, अजित पाटील, कल्पना कुसाळे, युवराज साळोखे, दीपक चव्हाण यांच्या सहकार्याने नवोदित नेमबाजांसाठी प्रशिक्षण शिबिर घेतात. कोल्हापूरच्याच राधिका बराले-हवालदार हिने कोलंबो (श्रीलंका) येथील २१ ऑगस्ट २००६ मध्ये दक्षिण आशियाई गेम्समध्ये १० मीटर एअररायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. २०१५ नंतर अभिज्ञा पाटीलनेही ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत पदक पटकावले.

तेजस्विनी, राही सरनोबत, शाहू माने यांचीही दमदार कामगिरीविश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनी सावंत हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात विजेतेपद पटकावणारी ती पहिली महिला भारतीय ठरली. राही सरनोबत ही २२ ऑगस्ट २०१८ मध्ये एशियाडमध्ये १० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली. २०१८ मध्ये कोल्हापूरच्या शाहू तुषार माने या १७ वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाने अर्जेंटिना (ब्युईनस एअरज) येथील युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेची चॅम्पियन राही सरनोबतने २०२१ मध्ये नवी दिल्लीतील ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावून सुवर्णपदक पटकावले. २०२२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा अशोक पाटील हिने २५ मीटर स्पोर्टस पिस्तूल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. यापूर्वी तिने आशियाई स्पर्धेत कांस्य, तर जागतिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. स्वप्निल कुसाळे यानेही २०२२ मध्ये एशियन गेम्समध्ये सांघिक सुवर्णपदक मिळवलं होतं. गोखले कॉलेजच्या अनुष्का पाटीलने सांघिक युवा गटात १० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. २०२४ मध्येच सोनम म्हसकरने विश्वचषक नेमबाजीत १० मीटर एअर रायफल्समध्ये रौप्यपदक पटकावले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्तीFootballफुटबॉलShootingगोळीबार