शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पदक जिंकण्याच्या निर्धारानेच आशियाडची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 04:21 IST

गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अपयशानंतर जकार्ता (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या आशियाडमध्ये देशाला पदक मिळवून देण्याच्या निर्धारानेच तयारी सुरू असल्याचे युवा आॅलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे याचे मत आहे.

नागपूर : गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अपयशानंतर जकार्ता (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या आशियाडमध्ये देशाला पदक मिळवून देण्याच्या निर्धारानेच तयारी सुरू असल्याचे युवा आॅलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे याचे मत आहे. वयाच्या १६ व्या वर्षी२००९च्या आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा अर्जुन पुरस्कारप्राप्त वीरधवल बेंगळुरू येथील राष्टÑीय शिबिरात सरावकरीत आहे. व्यस्ततेतून वेळ काढून खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या जलतरण स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तो बुधवारी नागपुरात होता.पत्रकारांशी संवाद साधताना तहसीलदार पदावर कार्यरत वीरधवल म्हणाला, ‘अपुºया सरावामुळे माझ्यासाठी राष्टÑकुल स्पर्धा चांगला अनुभव नव्हता. मालवण येथे त्यावेळी माझी नियुक्ती होती. तेथे सरावाची पुरेसी सोय नसल्याने स्पर्धेत चांगली कामगिरी झाली नव्हती, पण आशियाडमध्ये पदक जिंकण्याच्या निर्धारानेच उतरणार आहे.’खाडे ५० मीटर फ्री स्टाईल आणि बटर फ्लाय तसेच १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. राष्टÑकुल आणि आशियाडमध्ये सारखीच चढाओढ असल्याचे सांगून मला ५० मीटर प्रकारात पदकाची अपेक्षा असल्याचा विश्वास २०१० च्या आशियाडमध्ये कांस्य पदक जिंकणाºया वीरधवलने व्यक्त केला.>आॅलिम्पिकचाप्रवास नागपुरातून...२००५ साली वयाच्या १४ व्या वर्षी सिनियर राज्य स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत वीरधवल पहिल्यांदा नागपुरात पोहला. या शहराशी माझ्या गोड आठवणी जुळल्या असल्याचे सांगून तो म्हणाला, ‘माझा आॅलिम्पिकचा प्रवास नागपुरातून सुरू झाला. दुसºयांदा २०१५ मध्ये राज्य वरिष्ठ स्पर्धेसाठी पुन्हा नागपुरात पोहलो. आता २०२० च्या आॅलिम्पिकसाठी हे शहर ‘लकी’ ठरेल, अशी आशा आहे. १५ वर्षांच्या करिअरमध्ये वीरधवलने साऊथ एशियन गेम्समध्ये सहा सुवर्णांसह तीन स्पर्धा विक्रम नोंदविले आहेत. युवा खेळाडूंनी पाच ते सहा वर्षे संयम राखून खडतर सराव केल्यास आंतरराष्टÑीय पदके मिळविणे कठीण नसल्याचे दररोज १५ तास पोहणाºया वीरधवलने सांगितले.सिनियर स्तरावर अधिक स्पर्धा हवीदेशात जलतरणाच्या अपुºया पायाभूत सुविधा असल्याबद्दल खंत व्यक्त करीत सिनियरस्तरावरील स्पर्धांची संख्याही कमीअसल्याचे वीरधवलचे मत आहे.ज्युनियर स्तरावर चढाओढ असताना सिनियर स्तरावर स्पर्धा नसल्याने स्वत:ला सिद्ध करण्याची संधी कमी आहे. जलतरणात देशाला भरपूर पदके मिळू शकतात पण त्यासाठी सरकार आणि कार्पोरेटस्ने पुढाकार घेत सरावाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या, असे तो म्हणाला.जलतरणपटू संभ्रमात...जलतरण फेडरेशनने महाराष्टÑ संघटनेला अपात्र घोषित केल्याचा फटका जलतरणपटूंना बसत आहे. खेळाडू आणि पालकांना नेमके काय करावे हे कळेनासे झाले आहे.जलतरणपटूंचे करियर संपणार नाही, यासाठी संघटनांच्या पदाधिकाºयांनी परस्परांतीलमतभेद लवकर दूर करावेत, असे वीरधवलने आवाहन केले.