शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पदक जिंकण्याच्या निर्धारानेच आशियाडची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 04:21 IST

गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अपयशानंतर जकार्ता (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या आशियाडमध्ये देशाला पदक मिळवून देण्याच्या निर्धारानेच तयारी सुरू असल्याचे युवा आॅलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे याचे मत आहे.

नागपूर : गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अपयशानंतर जकार्ता (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या आशियाडमध्ये देशाला पदक मिळवून देण्याच्या निर्धारानेच तयारी सुरू असल्याचे युवा आॅलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे याचे मत आहे. वयाच्या १६ व्या वर्षी२००९च्या आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा अर्जुन पुरस्कारप्राप्त वीरधवल बेंगळुरू येथील राष्टÑीय शिबिरात सरावकरीत आहे. व्यस्ततेतून वेळ काढून खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या जलतरण स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तो बुधवारी नागपुरात होता.पत्रकारांशी संवाद साधताना तहसीलदार पदावर कार्यरत वीरधवल म्हणाला, ‘अपुºया सरावामुळे माझ्यासाठी राष्टÑकुल स्पर्धा चांगला अनुभव नव्हता. मालवण येथे त्यावेळी माझी नियुक्ती होती. तेथे सरावाची पुरेसी सोय नसल्याने स्पर्धेत चांगली कामगिरी झाली नव्हती, पण आशियाडमध्ये पदक जिंकण्याच्या निर्धारानेच उतरणार आहे.’खाडे ५० मीटर फ्री स्टाईल आणि बटर फ्लाय तसेच १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. राष्टÑकुल आणि आशियाडमध्ये सारखीच चढाओढ असल्याचे सांगून मला ५० मीटर प्रकारात पदकाची अपेक्षा असल्याचा विश्वास २०१० च्या आशियाडमध्ये कांस्य पदक जिंकणाºया वीरधवलने व्यक्त केला.>आॅलिम्पिकचाप्रवास नागपुरातून...२००५ साली वयाच्या १४ व्या वर्षी सिनियर राज्य स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत वीरधवल पहिल्यांदा नागपुरात पोहला. या शहराशी माझ्या गोड आठवणी जुळल्या असल्याचे सांगून तो म्हणाला, ‘माझा आॅलिम्पिकचा प्रवास नागपुरातून सुरू झाला. दुसºयांदा २०१५ मध्ये राज्य वरिष्ठ स्पर्धेसाठी पुन्हा नागपुरात पोहलो. आता २०२० च्या आॅलिम्पिकसाठी हे शहर ‘लकी’ ठरेल, अशी आशा आहे. १५ वर्षांच्या करिअरमध्ये वीरधवलने साऊथ एशियन गेम्समध्ये सहा सुवर्णांसह तीन स्पर्धा विक्रम नोंदविले आहेत. युवा खेळाडूंनी पाच ते सहा वर्षे संयम राखून खडतर सराव केल्यास आंतरराष्टÑीय पदके मिळविणे कठीण नसल्याचे दररोज १५ तास पोहणाºया वीरधवलने सांगितले.सिनियर स्तरावर अधिक स्पर्धा हवीदेशात जलतरणाच्या अपुºया पायाभूत सुविधा असल्याबद्दल खंत व्यक्त करीत सिनियरस्तरावरील स्पर्धांची संख्याही कमीअसल्याचे वीरधवलचे मत आहे.ज्युनियर स्तरावर चढाओढ असताना सिनियर स्तरावर स्पर्धा नसल्याने स्वत:ला सिद्ध करण्याची संधी कमी आहे. जलतरणात देशाला भरपूर पदके मिळू शकतात पण त्यासाठी सरकार आणि कार्पोरेटस्ने पुढाकार घेत सरावाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या, असे तो म्हणाला.जलतरणपटू संभ्रमात...जलतरण फेडरेशनने महाराष्टÑ संघटनेला अपात्र घोषित केल्याचा फटका जलतरणपटूंना बसत आहे. खेळाडू आणि पालकांना नेमके काय करावे हे कळेनासे झाले आहे.जलतरणपटूंचे करियर संपणार नाही, यासाठी संघटनांच्या पदाधिकाºयांनी परस्परांतीलमतभेद लवकर दूर करावेत, असे वीरधवलने आवाहन केले.