शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

Asian Games 2018: 2014च्या आशियाई स्पर्धेपेक्षा अधिक पदकं जिंकू - सुमारिवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:55 IST

Asian Games 2018: अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडू 2014च्या तुलनेत अधिक पदक जिंकतील असा विश्वास, भारतीय एथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष व माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारिवाला यांनी व्यक्त केला. 

अभिजित देशमुख (थेट जकार्ताहून) अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडू 2014च्या तुलनेत अधिक पदक जिंकतील असा विश्वास, भारतीय एथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष व माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारिवाला यांनी व्यक्त केला. 

ते म्हणाले, 'अॅथलेटिक्समध्ये खेळाडू पदकांचा वर्षाव करत आहेत. ट्रॅक आणि फिल्ड दोन्ही प्रकारामध्ये उत्तम कामगिरी होत आहे. ट्रॅक प्रकारात हिमा दास, द्युती चंद यांचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले, त्याची खंत आहे. नीरज चोप्राकडून सुवर्णपदक अपेक्षित होतेच. त्याच बरोबर तेजिंदरपाल सिंगने गोळाफेकत सुवर्ण, नीना वराकीलने लांब उडीत रौप्यपदक जिंकून भारताचा फिल्ड प्रकारात दबदबा दाखवला. अॅथलेटिक्सच्या अजून बऱ्याच स्पर्धा बाकी आहे, त्यामुळे 2014पेक्षा यंदा जास्त पदकं नक्कीच जिंकू.'

ते पुढे म्हणाले,' भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंना सरावासाठी खास परदेशात प्राग (चेक रिपब्लिक), थिम्पू (भूतान) येथे पाठवले होते. समुद्रसपाटीपासून उंच असलेल्या ठिकाणी सरावाचा फायदा नक्कीच झाला आहे. काही नवीन परदेशी प्रशिक्षकांची नेमणूक केल्याचा फायदा जाणवत आहे. प्रशिक्षक गलीना बुखारींनाचा मार्गदर्शनाखाली हिमा दासने जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. इथेही तिने उत्तम कामगिरी केली. मिश्र रिले स्पर्धेचे मी स्वागत करतो, खेळामध्ये नवीन नियमामुळे उत्सुकता वाढते आणि हे खेळसाठी चांगली बाब आहे. आम्ही २०२० ऑलिम्पिकचा  विचार करत आहोत. टोकियो येथे अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकून इतिहास घडला पाहिजे, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.' 

2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेची चांगली तयारी झाल्याचे सांगून ते म्हणाले,' 2020ची ऑलिम्पिक स्पर्धा जपानमध्ये होत असल्यामुळे यजमानांची चांगली तयारी झाली आहे.  सहाजिकच त्यांची कामगिरी चांगली होत आहे. चीनसुद्धा  नेहमीप्रमाणे उत्तम कामगिरी करणार. पण काही मध्यपूर्व आशियाई देश, आफ्रिकी खेळाडूंना काही वर्षातच दुहेरी नागरिकत्व देऊन आशियाई स्पर्धेत खेळवतात. अंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडेरेशनमध्ये हा मुद्दा मांडला आहे, नवीन नियमाप्रमाणे तीन वर्ष देशात राहिल्यानंतरच त्यांना आशियाई क्रीडा किंवा इतर स्पर्धेत मध्यपूर्व आशियाई देशाचे प्रतिनिधित्व करता येणार.'  

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाSportsक्रीडा