शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नेमबाजांच्या निराशाजनक कामगिरीचे होणार विश्लेषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 08:37 IST

भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) नेमबाजांसह अधिकाऱ्यांच्या कामगिरीचेही विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये भारताच्या पदरी सर्वाधिक निराशा आली आहे. ज्या खेळामध्ये भारताला सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती, त्या नेमबाजीच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठण्यातही भारतीयांना संघर्ष करावा लागला. त्यामुळेच आता भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) नेमबाजांसह अधिकाऱ्यांच्या कामगिरीचेही विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रकरणी तीन भागात समीक्षा होणार असून, यास याआधीच सुरुवात झाल्याची माहिती एनआरएआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. रिओ ऑलिम्पिक (२०१६) स्पर्धेत नेमबाजांच्या पदकांची झोळी रिकामी राहिल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमधूनही भारतीय नेमबाज रिकाम्या हाताने परतले. विशेष म्हणजे ऑलिम्पिकआधी झालेल्या विविध विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतीयांनी पदकांची लयलूट करत सर्वांना इशारा दिला होता. मात्र, ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांना विश्वचषक स्पर्धेतील लय मिळवता आली नाही.एनआरएआयच्या सूत्राने सांगितले की, ‘नेमबाजांच्या कामगिरीचे विश्लेषण सुरू झाले आहे. सर्वांत आधी खेळाडू, नंतर प्रशिक्षक व सहयोगी स्टाफ आणि त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामगिरीची चौकशी होईल.’ एनआरएआय अध्यक्ष रनिंदर सिंग यांच्याही कामगिरीचे विश्लेषण होणार असल्याचे संकेतही सूत्राने यावेळी  दिले.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021