शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नेमबाजांच्या निराशाजनक कामगिरीचे होणार विश्लेषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 08:37 IST

भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) नेमबाजांसह अधिकाऱ्यांच्या कामगिरीचेही विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये भारताच्या पदरी सर्वाधिक निराशा आली आहे. ज्या खेळामध्ये भारताला सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती, त्या नेमबाजीच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठण्यातही भारतीयांना संघर्ष करावा लागला. त्यामुळेच आता भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) नेमबाजांसह अधिकाऱ्यांच्या कामगिरीचेही विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रकरणी तीन भागात समीक्षा होणार असून, यास याआधीच सुरुवात झाल्याची माहिती एनआरएआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. रिओ ऑलिम्पिक (२०१६) स्पर्धेत नेमबाजांच्या पदकांची झोळी रिकामी राहिल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमधूनही भारतीय नेमबाज रिकाम्या हाताने परतले. विशेष म्हणजे ऑलिम्पिकआधी झालेल्या विविध विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतीयांनी पदकांची लयलूट करत सर्वांना इशारा दिला होता. मात्र, ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांना विश्वचषक स्पर्धेतील लय मिळवता आली नाही.एनआरएआयच्या सूत्राने सांगितले की, ‘नेमबाजांच्या कामगिरीचे विश्लेषण सुरू झाले आहे. सर्वांत आधी खेळाडू, नंतर प्रशिक्षक व सहयोगी स्टाफ आणि त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामगिरीची चौकशी होईल.’ एनआरएआय अध्यक्ष रनिंदर सिंग यांच्याही कामगिरीचे विश्लेषण होणार असल्याचे संकेतही सूत्राने यावेळी  दिले.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021