शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

‘होम पिच’ असले, तरी आव्हानात्मकच!

By admin | Updated: December 12, 2015 00:16 IST

आगामी टी-२० विश्वचषक भारतात होत आहे. असे असले तरी होम पिचचा भारताला फायदा होणार नाही; कारण आयपीएल स्पर्धेमुळे आघाडीच्या खेळाडूंचा भारतीय पिचवर चांगला सराव झाला आहे

मुंबई : आगामी टी-२० विश्वचषक भारतात होत आहे. असे असले तरी होम पिचचा भारताला फायदा होणार नाही; कारण आयपीएल स्पर्धेमुळे आघाडीच्या खेळाडूंचा भारतीय पिचवर चांगला सराव झाला आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धा आव्हानात्मकच असेल, असे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले. स्पर्धा आणि स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले. त्यानंतर आयोजित चर्चासत्रात विराट बोलत होता. संजय मांजरेकरच्या प्रश्नावर उत्तर देताना विराट म्हणाला की, गेल्या सात-आठ वर्षांपासून जगभरातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यामुळे त्यांना येथील खेळपट्टीचा तसेच हवामानाचा अंदाज आहे. त्यामुळे भारतासाठी ही स्पर्धा इतकी सोपी राहणार नाही. घरच्या मैदानावर खेळणे आता आमच्यासाठी इतकेही फायद्याचे ठरणारे नाही. त्यामुळे कोणताही संघ हा प्रबळ दावेदार ठरू शकतो. गेल्या वर्षी मात्र आम्ही फायनलपर्यंत मजल मारली होती. फायनलमध्ये पराभूत झाल्याने खूप दु:ख झाले होते, असेही विराटने सांगितले. विश्वचषक स्पर्धा मार्च-एप्रिल दरम्यान होणार आहे. धोनीकडून शिकणार...धोनीकडून काय शिकणार? या मांजरेकरच्या प्रश्नावर विराट म्हणाला, प्रतिकूल परिस्थितीत धैर्य न गमावता संघर्ष कसा करावा, हे कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीकडून शिकणार आहे. धोनी हा अत्यंत संयम राखून असतो. त्याची ही कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करेन, असे विराटने धोनीची प्रशंसा करीत म्हटले. तो म्हणाला, गमावलेले सामनेही धोनीने जिंकून दिले आहेत.त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचला. त्यानंतर कसोटी नंबर वन आणि टी-२० तही नंबर वन राहिला. एका कर्णधारासाठी यापेक्षा मोठे यश असू शकत नाही. >>>> सर्वच संघांसमोर आव्हान : रहाणेमुंबई : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात होत असली तरी भारतीय संघापुढे मोठे आव्हान असेल, अशा विराटच्या मतावर अंजिक्य रहाणेसुद्धा सहमत आहे. रहाणे म्हणाला की, घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघावर मोठा दबाव असेल. सर्व संघ जेतेपदासाठी मैदानात उतरतील. तुलनेत भारताची परीक्षा असेल. या खेळाच्या सर्व प्रकारात आनंद लुटण्याचा माझा प्रयत्न असतो. मात्र, टी-२० स्पर्धेत खेळणे विशेष ठरते. माझ्या खेळात खूप सुधारणा केल्या असून सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. सर्वच संघांना स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांसमोर आव्हान असणार आहे. टी-२० मध्ये खेळण्याची एक वेगळीच मजा असते त्यामुळे सर्वच संघातील खेळाडू स्वत:चा उत्कृष्ट खेळ दाखविण्याचा प्रयत्न करतील. या स्पर्धेत जो संघ सर्वश्रेष्ठ खेळी करेल तोच संघ विजयी ठरेल. ही स्पर्धा भारतात असल्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आमच्या संघाकडून अपेक्षा विजेतेपद जिंकण्याच्याच असणार आहेत. पण प्रत्येक सामन्यात खेळाडूंना सूर गवसेलच असे आताच सांगता येत नाही, असे अजिंक्य रहाणेने शेवटी सांगितले.