शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अष्टपैलू वेगवान गोलंदाजाचा शोध सुरूच

By admin | Updated: October 1, 2015 22:46 IST

वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या अष्टपैलूचा शोध अद्याप संपलेला नसून, त्यामुळे संघाचे योग्य संयोजन करण्यासाठी मदत मिळेल

धरमशाला : वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या अष्टपैलूचा शोध अद्याप संपलेला नसून, त्यामुळे संघाचे योग्य संयोजन करण्यासाठी मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला गोलंदाजी संयोजनाबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘आमच्याकडे चार फिरकीपटू (रविचंद्रन आश्विन, हरभजन सिंग, अमित मिश्रा व अक्षर पटेल) आणि तीन वेगवान गोलंदाज (मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार व श्रीनाथ अरविंद) आहेत. एक सीमर अष्टपैलू (स्टुअर्ट बिन्नी) संघात आहे. परिस्थितीनुसार खेळाडूंची निवड करण्यासाठी पर्याय आवश्यक आहे. याव्यतिरिक्त संघ दमदार कसा होईल, याकडेही लक्ष द्यावे लागते. दोन फिरकीपटूंना संधी दिली तर त्यातील एक चांगला फलंदाज असायला हवा. चांगली फलंदाजी करण्याची क्षमता असलेला आणि टी-२० मध्ये चार षटके व ५० षटकांच्या सामन्यात १० षटके वेगवान मारा करणारा अष्टपैलू खेळाडू संघात नाही. त्यामुळे याचा विचार करूनच संघाची निवड करावी लागते.’’कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करणार, याबाबत धोनीने स्पष्ट केलेले नाही. आमच्याकडे अनेक खेळाडू आघाडीच्या फळीतील फलंदाज आहेत. पण आयपीएल किंवा टी-२० सामन्यांत ते वेगवेगळ्या स्थानांवर खेळत असतात. रोहित डावाची सुरुवात करतो तर अजिंक्य रहाणे मधल्या फळीत खेळतो. अनेक खेळाडू आघाडीच्या फळीत खेळण्यास उत्सुक असतात. पण मधल्या व तळाच्या फळीतही कुणाला न कुणाला खेळावे लागेल, असेही धोनीने सांगितले. सुरेश रैना फिनिशरची भूमिका बजावण्यास तयार आहे का, याबाबत धोनीने नकारात्मक उत्तर दिले. धोनी म्हणाला, ‘‘रैना फिनिशर नाही. त्याने अनेक लढतींत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केलेली आहे.’’ या मालिकेमुळे आगमी टी-२० विश्वकप चॅम्पियनशिपच्या तयारीवर विशेष प्रभाव पडणार नाही, असेही धोनीने या वेळी सांगितले. मी अद्याप खेळपट्टी बघितलेली नाही; पण नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. दव जर अधिक पडले, तर नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. ७ वाजता सुरू होणाऱ्या लढतीत ७.१५ पासून दव पडायला सुरुवात झाली, तर उभय संघांसाठी परिस्थिती समान राहील. (वृत्तसंस्था)