शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अक्षर पटेल, रैनाला संधी मिळणार?

By admin | Updated: January 2, 2015 02:10 IST

भारतीय संघ व्यवस्थापन आॅस्ट्रलियाविरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटीत फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि अनुभवी फलंदाज सुरेश रैनाला संधी देण्याची शक्यता आहे़

सिडनी : भारतीय संघ व्यवस्थापन आॅस्ट्रलियाविरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटीत फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि अनुभवी फलंदाज सुरेश रैनाला संधी देण्याची शक्यता आहे़ फॉर्मशी झगडणारा शिखर धवन संघातून बाहेर होऊ शकतो़ संघात यष्टीरक्षक म्हणून रिद्धिमान साहा यांची निवड निश्चित मानली जात आहे़ सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसऱ्या दिवशी खेळपट्टीवर चेंडू टर्न होतो़ त्यामुळे फिरकी गोलंदाज आऱ अश्विनसह अक्षर पटेलचा संघात समावेश होऊ शकतो़ पटेलला दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे़ अक्षरने ९ वन-डे सामन्यांत यापूर्वी भारताने प्रतिनिधित्व केले आहे़ विशेष म्हणजे यापैकी ५ लढतीत कोहलीच संघाचा कर्णधार होता़ त्यामुळे कोहली शंभर टक्के अक्षरला संधी देईल, हे निश्चित आहे़ अक्षरने आतापर्यंत ११ प्रथम श्रेणी सामन्यांत खेळताना ३८ बळी मिळविले आहेत़ चौथ्या कसोटीत अक्षरला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळाले, तर मोहंमद शमी किंवा उमेश यादव यांच्यापैकी एका गोलंदाजाला बाहेर बसावे लागणार आहे़ कारण भारतीय संघ चार गोलंदाजांसह खेळण्याच्या भूमिकेवर ठाम राहण्याची शक्यता आहे़ भारतासाठी फलंदाजांची कामगिरी चिंतेचा विषय आहे़ सलामीवीर फलंदाज शिखर धवनला लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही़ त्याने आतापर्यंत ३ कसोटीत २७़८३ च्या सरासरीने केवळ १६७ धावांच केल्या आहेत़ त्यामुळे तोही संघातून बाहेर होऊ शकतो़ त्यामुळे के ़एल़ राहुल मुरली विजयसह डावाची सुरुवात करू शकतो़ विशेष म्हणजे राहुलचे एका सामन्यातून आकलन करू नये, असे मत महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले आहे़संघातून राहुललासुद्धा बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला, तर अजिंक्य रहाणे डावाची सुरुवात करू शकतो़ विशेष म्हणजे मुंबईकडून रणजित डावाची सुरुवात करण्याचा त्याला अनुभव आहे़ अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनाही संघात संधी मिळू शकते़संघ व्यवस्थापनाने धवन किंवा राहुल यांच्यापैकी एकाला संधी दिली, तर रोहित किंवा रैना यापैकी एकाला संधी मिळेल़ रोहित विदेशात आतापर्यंत स्वत:ला सिद्ध करू शकला नाही़ तसेच रैनाला पहिल्या तीनही सामन्यांत संधी मिळाली नव्हती़ त्यामुळे अखेरच्या सामन्यात तो खेळू शकतो़ (वृत्तसंस्था)उपकर्णधारपदासाठी चुरस नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी याने कसोटीतून अचानक निवृत्ती घेतल्यामुळे विराट कोहलीची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि फिरकी गोलंदाज आऱ आश्विन उपकर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत़भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आणि संघाचे संचालक रवी शास्त्री ज्या दोन खेळाडूंपैकी एकाची उपकर्णधारपदी नियुक्ती करू इच्छिातात त्यामध्ये रहाणे आणि आश्विन यांचा समावेश आहे़सूत्रांच्या माहितीनुसार सध्या क्रिकेटच्या तीनही प्रकारांत खेळणारा रहाणे उपकर्णधारपदाचा प्रबळ दावेदार आहे़ मात्र, आश्विन सिनिअर खेळाडू असल्यामुळे त्याच्याही नावाचा विचार होऊ शकतो़ रहाणे याने आतापर्यंत १३ कसोटीत १,०२६ धावा केल्या आहेत़ अल्पावधीत त्याने संघात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे़ या तुलनेत आश्विन सिनिअर खेळाडू असला तरी विदेश दौऱ्यात त्याला अंतिम एकादशमध्ये जागा मिळत नाही़ त्यामुळे रहाणेलाच उपकर्णधारपदासाठी पसंती मिळू शकते़