शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वायुसेनेने दोन नेमबाजांना ताबडतोब कामावर बोलावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 06:31 IST

भारत- पाकदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीचा विचार करता हा प्रोटोकॉल असल्याचे दोन्ही नेमबाजांनी सांगितले.

नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात सहभागी असलेले रविकुमार आणि दीपक कुमार या भारतीय नेमबाजांना वायुसेनेने त्वरित कामावर परतण्याचे आदेश दिले. भारत- पाकदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीचा विचार करता हा प्रोटोकॉल असल्याचे दोन्ही नेमबाजांनी सांगितले.

आयएसएसएफ विश्वचषकात कांस्य विजेता रविकुमारने सांगितले की, ‘वायुसेना क्रीडा नियंत्रण बोर्डाच्या सचिवाने आमच्याशी चर्चा करीत पुढील योजनांची माहिती जाणून घेतली, गरज भासल्यास मी सीमेवर जाण्यास सज्ज आहे.’ तसेच, ‘सराव आणि खेळाच्या तुलनेत नेहमी देशासाठी तत्पर असायला हवे,’ असे ज्युनियर वॉरंट अधिकारी असलेला रवी म्हणाला.

दीपक हा सार्जंट आहे. दोन्ही नेमबाजांना दहा मीटर एअर रायफल मिश्र प्रकाराच्या पात्रता फेरीत अपयश आल्यानंतर ते रेंज सोडून रवाना झाले. दीपक यावेळी म्हणाला की, ‘आम्हाला कमांडंरने पाचारण केले आहे. प्रत्येक स्पर्धा खेळल्यानंतर रिपोर्टिंगचा प्रोटोकॉल असतो. आम्हाला जे निर्देश मिळतील, त्याचे पालन करू.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकairforceहवाईदल