शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वायुसेनेने दोन नेमबाजांना ताबडतोब कामावर बोलावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 06:31 IST

भारत- पाकदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीचा विचार करता हा प्रोटोकॉल असल्याचे दोन्ही नेमबाजांनी सांगितले.

नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात सहभागी असलेले रविकुमार आणि दीपक कुमार या भारतीय नेमबाजांना वायुसेनेने त्वरित कामावर परतण्याचे आदेश दिले. भारत- पाकदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीचा विचार करता हा प्रोटोकॉल असल्याचे दोन्ही नेमबाजांनी सांगितले.

आयएसएसएफ विश्वचषकात कांस्य विजेता रविकुमारने सांगितले की, ‘वायुसेना क्रीडा नियंत्रण बोर्डाच्या सचिवाने आमच्याशी चर्चा करीत पुढील योजनांची माहिती जाणून घेतली, गरज भासल्यास मी सीमेवर जाण्यास सज्ज आहे.’ तसेच, ‘सराव आणि खेळाच्या तुलनेत नेहमी देशासाठी तत्पर असायला हवे,’ असे ज्युनियर वॉरंट अधिकारी असलेला रवी म्हणाला.

दीपक हा सार्जंट आहे. दोन्ही नेमबाजांना दहा मीटर एअर रायफल मिश्र प्रकाराच्या पात्रता फेरीत अपयश आल्यानंतर ते रेंज सोडून रवाना झाले. दीपक यावेळी म्हणाला की, ‘आम्हाला कमांडंरने पाचारण केले आहे. प्रत्येक स्पर्धा खेळल्यानंतर रिपोर्टिंगचा प्रोटोकॉल असतो. आम्हाला जे निर्देश मिळतील, त्याचे पालन करू.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकairforceहवाईदल