शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

इंग्लंड सर्वबाद ४८६, भारताचे फलंदाज पुन्हा फ्लॉप

By admin | Updated: August 17, 2014 17:41 IST

इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला असून इंग्लंडकडे तब्बल ३३८ धावांची आघाडी आहे. मात्र दुस-या डावातही भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले आहेत.

ऑनलाइन लोकमत 
लंडन, दि. १७ - पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला आहे. पहिल्या डावात इंग्लंडकडे तब्बल ३३८ धावांची आघाडी असून पराभव टाळण्यासाठी भारताची सर्व मदार आता फलंदाजांवर आहे. दुस-या डावातही भारताची सुरुवात निराशाजनकच झाली असून सलामीची जोडी अवघ्या नऊ धावांमध्येच तंबूत परतली आहे. 
लंडनमधील ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या १४८ धावांवर गुंडाळण्यात इंग्लंडच्या गोलदांजांना यश आले होते. या खेळपट्टीवर भारताचे गोलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले आहेत. इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला. तिस-या दिवशी सात बाद ३८५ धावांवरुन पुढे खेळताना इंग्लंडच्या तळाच्या सात फलंदाजांनी धावफलकावर तब्बल १०० धावा जोडल्या. जो रुटने दिमाखदार शतक ठोकले. रुटने ख्रिस जॉर्डन (२० धावा) आणि स्टुअर्ट ब्रॉड (३७ धावा) यांच्या मदतीने इंग्लंडला ४८६ धावांचा डोंगर उभारुन दिला. रुट १४९ धावांवर नाबाद राहिला. भारतातर्फे इशांत शर्माने ९६ धावांत चार विकेट घेतल्या. तर आर अश्विनने ७२ धावांमध्ये तीन विकेट घेतल्या. तर वरुण अ‍ॅरोनने दोन तर भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेतली. 
डावाने पराभव टाळण्यासाठी भारताला ३३८ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. मात्र पुन्हा एकदा भारताची फलंदाजांची अपयशाची मालिका सुरुच राहिली. मुरली विजय दोन धावांवर पायचीत तर गौतम गंभीर दोन धावांवर रनआऊट झाला आहे.  भारताची अवस्था दोन बाद ९ धावा अशी झाली असून पावसामुळे लवकर लंचब्रेक घेण्यात आला आहे.