शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
4
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
5
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
6
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
7
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
8
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
9
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
10
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
11
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
12
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
13
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
14
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
15
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
16
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
17
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
18
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
19
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड सर्वबाद ४८६, भारताचे फलंदाज पुन्हा फ्लॉप

By admin | Updated: August 17, 2014 17:41 IST

इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला असून इंग्लंडकडे तब्बल ३३८ धावांची आघाडी आहे. मात्र दुस-या डावातही भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले आहेत.

ऑनलाइन लोकमत 
लंडन, दि. १७ - पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला आहे. पहिल्या डावात इंग्लंडकडे तब्बल ३३८ धावांची आघाडी असून पराभव टाळण्यासाठी भारताची सर्व मदार आता फलंदाजांवर आहे. दुस-या डावातही भारताची सुरुवात निराशाजनकच झाली असून सलामीची जोडी अवघ्या नऊ धावांमध्येच तंबूत परतली आहे. 
लंडनमधील ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या १४८ धावांवर गुंडाळण्यात इंग्लंडच्या गोलदांजांना यश आले होते. या खेळपट्टीवर भारताचे गोलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले आहेत. इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला. तिस-या दिवशी सात बाद ३८५ धावांवरुन पुढे खेळताना इंग्लंडच्या तळाच्या सात फलंदाजांनी धावफलकावर तब्बल १०० धावा जोडल्या. जो रुटने दिमाखदार शतक ठोकले. रुटने ख्रिस जॉर्डन (२० धावा) आणि स्टुअर्ट ब्रॉड (३७ धावा) यांच्या मदतीने इंग्लंडला ४८६ धावांचा डोंगर उभारुन दिला. रुट १४९ धावांवर नाबाद राहिला. भारतातर्फे इशांत शर्माने ९६ धावांत चार विकेट घेतल्या. तर आर अश्विनने ७२ धावांमध्ये तीन विकेट घेतल्या. तर वरुण अ‍ॅरोनने दोन तर भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेतली. 
डावाने पराभव टाळण्यासाठी भारताला ३३८ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. मात्र पुन्हा एकदा भारताची फलंदाजांची अपयशाची मालिका सुरुच राहिली. मुरली विजय दोन धावांवर पायचीत तर गौतम गंभीर दोन धावांवर रनआऊट झाला आहे.  भारताची अवस्था दोन बाद ९ धावा अशी झाली असून पावसामुळे लवकर लंचब्रेक घेण्यात आला आहे.