शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पराभवानंतर सिंधूने जे केलं त्यामुळे तुम्हालाही अभिमान वाटेल

By admin | Updated: August 20, 2016 20:18 IST

रिओ ऑलिम्पिकच्या बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत पराभूत होऊनही सिंधूने खेळाचा मान राखत विजेत्या कॅरोलिनाची खाली पडलेली रॅकेट उचलून योग्य ठिकाणी ठेवली.

- शिवराज यादव / ऑनलाइन लोकमत
रिओ दी जानेरो, दि. 20 - अतिशय चुरशीच्या आणि क्षणोक्षणी रोमांच उभे करणाऱ्या बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. मात्र पराभव होऊनही तमाम भारतीयांना तिने सुवर्ण आठवणी देत रौप्य मिळवले आणि ‘गोल्डन गर्ल’ बनली. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली बॅडमिंटनपटू बनण्याचा बहुमानही तिने मिळवला. मात्र पराभवानंतरही पी व्ही सिंधूने जे केलं ते वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल.
अंतिम सामना जिंकल्यानंतर कॅरोलिनाला अश्रू अनावर झाले होते. सामना जिंकल्यानंतर जल्लोष साजरा करताना तिने रॅकेट कोर्टवरच ठेवून दिली होती. विजय झाल्यानंतर समोर सुवर्णपदक दिसत असताना कशाचंही भान न राहणं हे साहजिक आहे. पराभव झाल्याने सिंधूही काही वेळ कोर्टवर खाली बसून होती. पण नंतर खेळभावना दाखवत तिने स्वत: जाऊन कॅरोलिनाला मिठी मारत शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर रेफ्रीकडे जात असताना कॅरोलिनाची खाली पडलेली रॅकेट उचलून योग्य ठिकाणी ठेवली. 
वर्ल्ड चॅम्पियनच्या थाटात खेळणारी कॅरोलिना जिंकल्यानंतर सिंधूच्या थेट गळ्यातच पडली अन् सिंधू हारूनही जिंकली होती. तमाम भारतीयांची मनं तिने अगोदरच जिंकली होती, पण तिने खाली पडलेली रॅकेट उचलून आदरही मिळवला. आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला बॅट फेकून देताना कधी पाहिल्याचं आठवतं का ? नाही ना. कारण तो आपल्या खेळाचा आदर करतो आणि नेमकी हीच भावना पी व्ही सिंधूमध्ये पाहायला मिळते. उत्तम खेळाडू असण्याचे सर्व गुण तिच्यात पाहायला मिळतायत, त्यामुळे भविष्यात तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनच्या आव्हानाचा सिंधूने उत्तम प्रतिकार केला. मात्र, तिस-या व निर्णायक गेममध्ये सिंधूला पराभव पत्करावा लागला आणि सुवर्णपदक मारिनने पटकावले. सिंधूने मिळवलेले रौप्यपदक हे भारताचे ऑलिम्पिक इतिहासातील एकूण चौथे वैयक्तिक रौप्यपदक आहे. यापूर्वी नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड (अथेन्स २00४), विजयकुमार (लंडन २0१२) आणि मल्ल सुशीलकुमार (लंडन २0१२) यांनी तीन रौप्यपदके देशाला मिळवून दिली आहेत. तरीही बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिकचे रौप्य पदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली.
सिंधू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पाचवी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नाम मल्लेश्वरी, मेरि कोम, सायना नेहवाल आणि साक्षी मलिक यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. पण सिंधूने यापुढे जात रौप्यपदकाची कमाई केली.
 
 
पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरली आहे. पी व्ही सिंधूचं वय 21 असून सर्वात तरुण वयात पदक जिंकण्याचा मानही तिने मिळवला आहे.