शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

३६ साल बाद...

By admin | Updated: July 19, 2016 17:36 IST

रियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे ‘जम्बो’ पथक सहभागी होत आहे. हे पथक जम्बो होण्यास हातभार लागला तो महिला हॉकी संघाचा.

- विश्वास चरणकर/कोल्हापूररियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे ‘जम्बो’ पथक सहभागी होत आहे. हे पथक जम्बो होण्यास हातभार लागला तो महिला हॉकी संघाचा. कारण ३६ वर्षांनंतर भारतीय महिला आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. या १६ खेळाडूंमुळे भारताचे पथक जम्बो झाले आहे. ३६ वर्षांनंतर मिळालेल्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी आता या १६ खेळाडूंवर पडली आहे.भारतीय महिला संघ १९८0 साली रशियात झालेल्या आॅलिम्पिकमध्ये खेळला होता. त्यानंतर भारताला आॅलिम्पिक पात्रता मिळविता आलेली नाही. भारतीय महिला संघ आॅलिम्पिकमध्ये पुन्हा कधी खेळणार, असा एकच प्रश्न सतावत होता; पण डिफेंडर सुशीला चानूच्या नेतृत्वाखाली हे स्वप्न यंदा साकारताना दिसत आहे. नुकत्याच बेल्जियममध्ये झालेल्या विश्व हॉकी लीग सेमिफायनलमध्ये भारताने जपानला हरवून पाचवे स्थान मिळविले. या विजयामुळे भारत २0१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये पोहोचला आहे.१९८0 मध्ये मॉस्को येथे झालेल्या आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघ खेळला होता. तेव्हापासून हा संघ आॅलिम्पिकच्या दरवाजावर धडका मारतो आहे; पण ही धडक यंदा यशस्वी झाली. रितूराणीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुलींनी बेल्जियममध्ये झालेल्या विश्व हॉकी लीग सेमिफायनलमध्ये चमकदार कामगिरी करून ही संधी निर्माण केली आहे. यापूर्वी १९८0 ला जेव्हा भारतीय संघ आॅलिम्पिकमध्ये खेळत होता, तेव्हा आजच्या या संघातील एकही खेळाडू जन्मालाही आली नव्हती. विश्व हॉकी लीग सेमिफायनलमध्ये नेदरलँडकडून मोठा पराभव झाल्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाच्या आॅलिम्पिक मिशनला धक्का बसला होता. जपानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी लास्ट चान्स होता. त्यामुळे मुलींनी जीवतोड मेहनत केली. त्यांनी जपानला हरविले आणि पाचवे स्थान मिळविले. या विजयाने देशाला आॅलिम्पिकचे तिकीट मिळवून दिले. या संघाचे नेतृत्व रेल्वेकडून खेळणारी मणिपूरची खेळाडू सुशीला चानू करीत आहे. बंगरूळू येथे झालेल्या शिबिरात रितूराणीने गैरवर्तन केल्यामुळे तिला संघातून वगळण्यात आले, त्यामुळे कर्णधारपदाची माळ सुशीलाच्या गळ्यात पडली. >तिकीट तपासणीसच्या हातात ‘आॅलिम्पिक तिकीट’आॅलिम्पिकमध्ये खेळावयास मिळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. आणि एखाद्या संघाचा कर्णधार म्हणून खेळावयास मिळत असेल तर ‘सोने पे सुहागा’. अशीच काहीशी अनपेक्षित लॉटरी भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार सुशीला चानू हिला लागली आहे. भारतीय संघाला आॅलिम्पिकचे तिकीट मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचललेली रितू राणी गैरवर्तनामुळे आॅलिम्पिक संघातून बाहेर पडली अन् कर्णधारपदाची माळ मणिपूरच्या सुशीला चानूच्या गळ्यात पडली.सुशीलाने २00३ साली मणिपूर अ‍ॅकॅडमीतून हॉकीचा प्रारंभ केला आणि २00८ साली ती राष्ट्रीय संघात निवडली गेली. आठ वर्षांत शंभराहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या सुशीलाच्या नेतृत्वाखाली भारताच्या महिला हॉकी संघाने २०१३ साली ज्यु. वर्ल्ड कप स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. सुशीलाचा रेल्वे खात्यात ज्यु. तिकीट तपासणीस असा हुद्दा आहे. पण आज तिच्या हातात ‘तिकीट’ आहे. सव्वाशे कोटी जनतेच्या अपेक्षांना ती कशी सामोरे जाते हे लवकरच कळेल.>भारतीय संघ असा गोलकीपर : सविता, डिफेंडर : सुशीला चानू (कर्णधार), दीपग्रेस एक्का, दीपिका (उपकर्णधार), नमिता टोपो, सुनीता लाकडा, मिडफिल्डर : नवज्योत कौर, मोनिका, निक्की प्रधान, रेणुका यादव, लिलिमा मिंज, फॉरवर्ड : अनुराधा देवी थोकचोम, पूनम राणी, वंदना कटारिया, राणी, प्रीती दुबे, राखीव खेळाडू : नियालूम लाल रुआत फेली (डिफेंडर) आणि रजनी एटीमारपू.