शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

खराब कामगिरी कराल तर खबरदार...; एएफआयने खेळाडूंना दिला कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 09:22 IST

टोकियोत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याचा इशारा शुक्रवारी दिला.

नवी दिल्ली : लांबउडीतील खेळाडू एम. श्रीशंकर आणि २० किमी चालण्याच्या शर्यतीचा खेळाडू केटी इरफान यांच्या फॉर्ममधील घसरणीनंतरही भारतीय ॲथ्लेटिक्स महासंघाने (एएफआय) त्यांना ऑलिम्पिक पथकातून बाहेर केलेले नाही. तथापि, टोकियोत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याचा इशारा शुक्रवारी दिला. एएफआयच्या निवड समितीने शुक्रवारी तातडीच्या बैठकीत २६ सदस्यांच्या संघातून दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता न दाखविण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेतला. बेंगळुरू येथे अलीकडे चाचणीच्या वेळी केलेल्या खराब कामगिरीमुळे या दोन खेळाडूंना बाहेर करावे, असे काहींचे मत होते. पण चाचणीचे आयोजन फिटनेससाठी करण्यात आले, फॉर्म पाहण्यासाठी नव्हे, असे समितीचे मत होते.

बुधवारी साई केंद्रात झालेल्या फिटनेस चाचणीत श्रीशंकरने केवळ ७.४८ मीटर लांबउडी घेतली. मार्चमध्ये फेडरेशन चषकात त्याने ८.२६ मीटरची नोंद करीत टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठली होती. इरफानची फिटनेस चाचणी ९ जुलैला झाली. मार्च २०१९ ला जपानच्या नोमी शहरात झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी करीत इरफान टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. त्याने रांची येथील राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता, मात्र शर्यत पूर्ण करू शकला नव्हता. मेमध्ये इरफानला कोरोना झाला होता.

भारताचे २५ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मिळून ४४ जण शुक्रवारी सायंकाळी टोकियोकडे रवाना झाले. ॲथ्लेटिक्समध्ये पदकाची सर्वाधिक अपेक्षा भालाफेकपटू नीरज चोप्राकडून असेल. तो कोच आणि फिजिओसोबत २६ जुलै रोजी स्वीडनमधील सरावातून थेट टोकियोत दाखल होणार आहे. ऑलिम्पिक ॲथ्लेटिक्सचे आयोजन ३० जुलै रोजी सुरू होईल. ते ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

कठोर संदेश सर्वांसाठी

एएफआय अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले, ‘श्रीशंकर आणि इरफान या दोन्ही खेळाडूंच्या कोचेसकडून चाचणीतील खराब कामगिरीबाबत जाणून घेतले. दोघांनीही टोकियोत सर्वोत्कृष्ट कामगिरीची हमी दिली आहे. श्रीशंकरचे वडील हेच त्याचे कोच आहेत. दोन्ही खेळाडूंनी टोकियोत चांगली कामगिरी न केल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. हा संदेश टोकियोत सहभागी झालेल्या सर्वच ॲथ्लीटसाठी असेल.’ 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021