शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

फलंदाजी क्रम बदलल्याचा फायदा

By admin | Updated: October 13, 2014 06:30 IST

संघाच्या फायद्यासाठी फलंदाजीला ‘टू डाऊन’ उतरण्यास सहमती दर्शविणाऱ्या विराट कोहलीची भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रशंसा केली

नवी दिल्ली : संघाच्या फायद्यासाठी फलंदाजीला ‘टू डाऊन’ उतरण्यास सहमती दर्शविणाऱ्या विराट कोहलीची भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रशंसा केली. वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यातील ही रणनीती भविष्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. फलंदाजी क्रमातील बदलामुळे संघात ताळमेळ साधला गेला. कोहलीने ६२ धावांची खेळी करताना कारकिर्दीतील ३१वे अर्धशतक झळकाविले आणि सूर गवसल्याचे संकेत दिले. कोहलीने सुरेश रैनासोबत (६२) चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केल्यामुळे भारताने ५० षटकांत ७ बाद २६३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. भारताने दुसऱ्या लढतीत ४८ धावांनी विजय मिळवित मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विजय मिळविल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘कोहली अनुभवी असून, संघाला काय अपेक्षित आहे, याची त्याला कल्पना आहे. नियमित स्थानापेक्षा एका स्थानाने खाली फलंदाजी करण्यासाठी त्याला तयार करण्यात यशस्वी ठरलो. संघाच्या हितासाठी हे आवश्यक असल्याचे त्याच्या लक्षात आहे. आम्हाला सर्वच बाबी तपासाव्या लागतात.’कोहलीच्या स्थानी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अंबाती रायडूने ३२ धावांची उपयुक्त खेळी केली. धोनीनेही नाबाद ५१ धावा फटकाविल्या. धोनी पुढे म्हणाला, ‘संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू पाचव्या, सहाव्या व सातव्या क्रमांकावर खेळणे संघासाठी हिताचे आहे. त्यामुळे विराटच्या फलंदाजी क्रमामध्ये बदल करण्यास मदत मिळाली. त्याला सूर गवसला. रायडूला लय गवसण्यासाठी वेळ मिळाला. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या रणनीतीवर प्रभाव पडला.’ फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावली. २६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीज संघ एकवेळ २ बाद १७० अशा सुस्थितीत होता. त्यानंतर सामनावीर ठरलेल्या मोहम्मद शमीने (४-३६) सलामीवीर ड्वेन स्मिथला (९७) तंबूचा मार्ग दाखवित भारतीय संघाला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान केली. त्यानंतर लेग स्पिनर अमित मिश्रा (२-४०) आणि रवींद्र जडेजा (३-४४) यांनी विंडीजचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. धोनीने सर्वच गोलंदाजांची प्रशंसा केली. धोनी म्हणाला, ‘या खेळपट्टीवर चेंडू असमतोल उसळत होता. आम्ही २० धावा कमी फटकाविल्या, पण गोलंदाजांनी अचूक मारा करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव कायम राखणे महत्त्वाचे होते. शमीने चांगला स्पेल केला. मिश्राने अचूक मारा केला, तर त्यानंतर जडेजाने आपली भूमिका चोख बजावली.’ (वृत्तसंस्था)