शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाजी क्रम बदलल्याचा फायदा

By admin | Updated: October 13, 2014 06:30 IST

संघाच्या फायद्यासाठी फलंदाजीला ‘टू डाऊन’ उतरण्यास सहमती दर्शविणाऱ्या विराट कोहलीची भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रशंसा केली

नवी दिल्ली : संघाच्या फायद्यासाठी फलंदाजीला ‘टू डाऊन’ उतरण्यास सहमती दर्शविणाऱ्या विराट कोहलीची भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रशंसा केली. वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यातील ही रणनीती भविष्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. फलंदाजी क्रमातील बदलामुळे संघात ताळमेळ साधला गेला. कोहलीने ६२ धावांची खेळी करताना कारकिर्दीतील ३१वे अर्धशतक झळकाविले आणि सूर गवसल्याचे संकेत दिले. कोहलीने सुरेश रैनासोबत (६२) चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केल्यामुळे भारताने ५० षटकांत ७ बाद २६३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. भारताने दुसऱ्या लढतीत ४८ धावांनी विजय मिळवित मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विजय मिळविल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘कोहली अनुभवी असून, संघाला काय अपेक्षित आहे, याची त्याला कल्पना आहे. नियमित स्थानापेक्षा एका स्थानाने खाली फलंदाजी करण्यासाठी त्याला तयार करण्यात यशस्वी ठरलो. संघाच्या हितासाठी हे आवश्यक असल्याचे त्याच्या लक्षात आहे. आम्हाला सर्वच बाबी तपासाव्या लागतात.’कोहलीच्या स्थानी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अंबाती रायडूने ३२ धावांची उपयुक्त खेळी केली. धोनीनेही नाबाद ५१ धावा फटकाविल्या. धोनी पुढे म्हणाला, ‘संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू पाचव्या, सहाव्या व सातव्या क्रमांकावर खेळणे संघासाठी हिताचे आहे. त्यामुळे विराटच्या फलंदाजी क्रमामध्ये बदल करण्यास मदत मिळाली. त्याला सूर गवसला. रायडूला लय गवसण्यासाठी वेळ मिळाला. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या रणनीतीवर प्रभाव पडला.’ फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावली. २६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीज संघ एकवेळ २ बाद १७० अशा सुस्थितीत होता. त्यानंतर सामनावीर ठरलेल्या मोहम्मद शमीने (४-३६) सलामीवीर ड्वेन स्मिथला (९७) तंबूचा मार्ग दाखवित भारतीय संघाला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान केली. त्यानंतर लेग स्पिनर अमित मिश्रा (२-४०) आणि रवींद्र जडेजा (३-४४) यांनी विंडीजचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. धोनीने सर्वच गोलंदाजांची प्रशंसा केली. धोनी म्हणाला, ‘या खेळपट्टीवर चेंडू असमतोल उसळत होता. आम्ही २० धावा कमी फटकाविल्या, पण गोलंदाजांनी अचूक मारा करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव कायम राखणे महत्त्वाचे होते. शमीने चांगला स्पेल केला. मिश्राने अचूक मारा केला, तर त्यानंतर जडेजाने आपली भूमिका चोख बजावली.’ (वृत्तसंस्था)