शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

नकारात्मक विचारापेक्षा परिस्थिती स्वीकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:30 IST

स्वरूप सावनूर; भारतीय खेळाडूंना क्रीडा मनसोपचारतज्ज्ञाचा सल्ला

रोहित नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘सध्या लॉकडाउनमुळे सर्वच खेळाडू आपापल्या घरी असून मैदानापासूनच दूर आहेत. हीच गोष्ट त्यांना सर्वात जास्त सलत आहे. दररोज नेहमीचा सराव न केल्यास, नक्कीच खेळाडूंच्या कामगिरीवर थोडा परिणाम होईल, पण आत्ताची परिस्थिती खेळाडूंनी समजून घ्यावी. नकारात्मक विचार करण्यापेक्षा या परिस्थितीचा सर्वांनी स्वीकार करावा,’ असा मोलाचा संदेश क्रीडा मनसोपचारतज्ज्ञ डॉ. स्वरूप सावनूर यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून खेळाडूंना दिला आहे.डॉ. सावनूर हे पुण्यातील लक्ष्य संस्थेच्या माध्यमातून देशातील अनेक आघाडीच्या खेळाडूंना मानसिक प्रशिक्षण देतात. बॉक्सर पूजा राणी, सिमरनजीत कौर, दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल, आघाडीचा कुस्तीगीर सुनील कुमार, युवा बुद्धिबळपटू विदित गुजराथी यांच्यासह अनेक रणजी क्रिकेटपटूंनाही सावनूर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कोरोना विषाणूमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे खेळाडू मैदानापासून दूर असले तरी घरातच व्यायाम करून शारीरिक तंदुरुस्ती राखण्याचा प्रयत्न करत आहेत. मैदानावर न गेल्यास कामगिरीवर परिणाम होईल, अशी भीतीही अनेक खेळाडूंमध्ये आहे.याबाबत सावनूर म्हणाले की, ‘आज संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध लढतोय. परिणाम नक्कीच दिसेल आणि ते स्वाभाविक आहे, पण खेळाडूंनी याचा स्वीकार करावा. परिस्थिती सुधारल्यानंतर आपल्याला योग्य योजना आखता येतील. यासाठी सर्व खेळाडूंनी मानसिकरीत्या सक्षम राहणे अत्यंत गरजेचे आहे. कामगिरीत थोडा परिणाम नक्कीच होईल, पण त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.’सावनूर पुढे म्हणाले की, ‘लॉकडाउनचा काळ सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. खेळाडू मैदानापासून दूर आहेत. ते कायम स्पर्धेत व्यस्त असतात, त्यादृष्टीने त्यांचा सातत्याने सराव सुरू असतो. सध्या हे सर्व थांबले असल्याने त्यांंच्या मनात लय बिघडण्याची भीती आहे. यामुळे खेळाडू अतिरिक्त विचार करतात. नक्कीच आता दैनंदिन वेळापत्रक नसल्याने खेळाडूंच्या मनावर परिणाम होणारच, पण ते नकारात्मकतेने घेऊ नका. म्हणूनच हा वेळ खेळाडूंसाठी आव्हानात्मक आहे.’आॅलिम्पिक पात्रतेचा दबाव!‘आॅलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्यानंतर खेळाडूंमध्ये पात्र ठरलेले आणि पात्रतेसाठी सज्ज असलेले असे दोन गट निर्माण झाले आहेत. आॅलिम्पिक पुढे गेल्याने नक्कीच मानसिकरीत्या खेळाडूंवर परिणाम झाला आहे. जे खेळाडू पात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर होते, ते आॅलिम्पिक पात्रतेच्या विचाराने दबावात असणार. खेळाडूंनी वर्षभराचा विचार करण्यापेक्षा पुढील सहा महिन्यांचा विचार करण्याची गरज आहे,’ असेही डॉ. स्वरूप सावनूर यांनी सांगितले.