शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

नकारात्मक विचारापेक्षा परिस्थिती स्वीकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:30 IST

स्वरूप सावनूर; भारतीय खेळाडूंना क्रीडा मनसोपचारतज्ज्ञाचा सल्ला

रोहित नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘सध्या लॉकडाउनमुळे सर्वच खेळाडू आपापल्या घरी असून मैदानापासूनच दूर आहेत. हीच गोष्ट त्यांना सर्वात जास्त सलत आहे. दररोज नेहमीचा सराव न केल्यास, नक्कीच खेळाडूंच्या कामगिरीवर थोडा परिणाम होईल, पण आत्ताची परिस्थिती खेळाडूंनी समजून घ्यावी. नकारात्मक विचार करण्यापेक्षा या परिस्थितीचा सर्वांनी स्वीकार करावा,’ असा मोलाचा संदेश क्रीडा मनसोपचारतज्ज्ञ डॉ. स्वरूप सावनूर यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून खेळाडूंना दिला आहे.डॉ. सावनूर हे पुण्यातील लक्ष्य संस्थेच्या माध्यमातून देशातील अनेक आघाडीच्या खेळाडूंना मानसिक प्रशिक्षण देतात. बॉक्सर पूजा राणी, सिमरनजीत कौर, दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल, आघाडीचा कुस्तीगीर सुनील कुमार, युवा बुद्धिबळपटू विदित गुजराथी यांच्यासह अनेक रणजी क्रिकेटपटूंनाही सावनूर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कोरोना विषाणूमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे खेळाडू मैदानापासून दूर असले तरी घरातच व्यायाम करून शारीरिक तंदुरुस्ती राखण्याचा प्रयत्न करत आहेत. मैदानावर न गेल्यास कामगिरीवर परिणाम होईल, अशी भीतीही अनेक खेळाडूंमध्ये आहे.याबाबत सावनूर म्हणाले की, ‘आज संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध लढतोय. परिणाम नक्कीच दिसेल आणि ते स्वाभाविक आहे, पण खेळाडूंनी याचा स्वीकार करावा. परिस्थिती सुधारल्यानंतर आपल्याला योग्य योजना आखता येतील. यासाठी सर्व खेळाडूंनी मानसिकरीत्या सक्षम राहणे अत्यंत गरजेचे आहे. कामगिरीत थोडा परिणाम नक्कीच होईल, पण त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.’सावनूर पुढे म्हणाले की, ‘लॉकडाउनचा काळ सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. खेळाडू मैदानापासून दूर आहेत. ते कायम स्पर्धेत व्यस्त असतात, त्यादृष्टीने त्यांचा सातत्याने सराव सुरू असतो. सध्या हे सर्व थांबले असल्याने त्यांंच्या मनात लय बिघडण्याची भीती आहे. यामुळे खेळाडू अतिरिक्त विचार करतात. नक्कीच आता दैनंदिन वेळापत्रक नसल्याने खेळाडूंच्या मनावर परिणाम होणारच, पण ते नकारात्मकतेने घेऊ नका. म्हणूनच हा वेळ खेळाडूंसाठी आव्हानात्मक आहे.’आॅलिम्पिक पात्रतेचा दबाव!‘आॅलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्यानंतर खेळाडूंमध्ये पात्र ठरलेले आणि पात्रतेसाठी सज्ज असलेले असे दोन गट निर्माण झाले आहेत. आॅलिम्पिक पुढे गेल्याने नक्कीच मानसिकरीत्या खेळाडूंवर परिणाम झाला आहे. जे खेळाडू पात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर होते, ते आॅलिम्पिक पात्रतेच्या विचाराने दबावात असणार. खेळाडूंनी वर्षभराचा विचार करण्यापेक्षा पुढील सहा महिन्यांचा विचार करण्याची गरज आहे,’ असेही डॉ. स्वरूप सावनूर यांनी सांगितले.