शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

डीआरएस स्वीकारा

By admin | Updated: December 22, 2014 04:52 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत काही निर्णय भारताच्या विरोधात गेल्यानंतर आजी व माजी क्रिकेटपटूंच्या मते,

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत काही निर्णय भारताच्या विरोधात गेल्यानंतर आजी व माजी क्रिकेटपटूंच्या मते, आता वादग्रस्त डीआरएस (पंचांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची पद्धत) पद्धतीचा स्वीकार करण्याची वेळ आलेली आहे. ‘बीसीसीआय’ने ‘डीआरएस’चा स्वीकार केला नाही तर त्याचा फटका संघाला बसत आहे, असे मत आजी-माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे.भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मणचा अद्याप डीआरएसला विरोध कायम आहे. लक्ष्मण म्हणाला, ‘फुलप्रुफ प्रणालीचे स्वागत आहे. माझा डीआरएसला विरोध नाही, पण यामध्ये अचूकता येण्यासाठी बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. हॉटस्पॉट व हॉक आयबाबत अद्याप मला विश्वास नाही. हॉक आयमध्ये पायचितच्या निर्णयाबाबत चेंडूची दिशा निश्चित होते. जोपर्यंत निर्णय समीक्षा प्रणालीमध्ये या दोन महत्त्वाच्या तंत्रांबाबत अचूकता येत नाही तोपर्यंत डीआरएसच्या उपयोगासाठी मंजुरी देताना गंभीरतेने विचार होणे आवश्यक आहे.’भारताचा अन्य माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर म्हणाला, ‘सुरुवातीला माझा डीआरएसला विरोध होता, पण अ‍ॅडिलेल व ब्रिस्बेन कसोटी सामन्यांत पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे याचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे वाटते. डीआरएस पूर्णपणे अचूक नाही, याची कल्पना आहे, पण आता या तंत्राचा आपण स्वीकार करायला हवा. अनेक सोपे निर्णय आपल्या विरोधात जात आहेत. त्यामुळे मालिकेत आपले मोठे नुकसान झाले आहे. पंचगिरी चांगली नसल्यामुळे बॅड-पॅड निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पहिल्या कसोटी सामन्यात काही चुका झाल्या. आता डीआरएसचा स्वीकार करणे आवश्यक आहे.’माजी फिरकीपटू ईरापल्ली प्रसन्ना व सलामीवीर चेतन चौहान यांनी डीआरएसचा स्वीकार करण्याच्या बाजूने मत व्यक्त केले. प्रसन्ना म्हणाले, ‘सुरुवातीपासून मी डीआरएसच्या बाजूने आहे. याचा उपयोग का करण्यात येत नाही, याबाबत बीसीसीआयला विचारणे योग्य ठरेल.’चौहान म्हणाले, ‘क्रिकेटमध्ये एक चुकीचा निर्णय सामन्याचा निकाल बदलण्यासाठी पुरेसा असतो. मी सुरुवातीपासून डीआरएसला पद्धतीचा अवलंब करण्याच्या बाजूने आहे. याचा आहे त्यास्थितीत स्वीकार करा किंवा तांत्रिक समितीला यामध्ये अचूकता आणण्यासाठी कार्य करू द्या. ’ (वृत्तसंस्था)