शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अचूक वेध घेण्याची क्षमता...

By admin | Updated: July 28, 2016 04:08 IST

अगदी पौराणिक काळापासून इतिहास असलेला म्हणून ओळखला जाणारा खेळ म्हणजे धनुर्विद्या म्हणजेच तिरंदाजी. आधुनिक तिरंदाजी १९७० मध्ये भारतात आल्यानंतर हळूहळू

- रोहित नाईक, मुंबईअगदी पौराणिक काळापासून इतिहास असलेला म्हणून ओळखला जाणारा खेळ म्हणजे धनुर्विद्या म्हणजेच तिरंदाजी. आधुनिक तिरंदाजी १९७० मध्ये भारतात आल्यानंतर हळूहळू या खेळाने येथे पाय रोवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सातत्याने राष्ट्रीय स्पर्धांद्वारे भारतीयांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली. यंदाच्या रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे एकूण ४ खेळाडू तिरंदाजीमध्ये सहभागी होणार असून यामध्ये केवळ एकच पुरुष खेळाडू आहे, हे विशेष. दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी माझी आणि बोम्बायलादेवी हे बलाढ्य खेळाडू वैयक्तिक, तसेच सांघिक प्रकारात पदकासाठी प्रयत्न करतील, तर अतानु दास पुरुष वैयक्तिक गटात कसब दाखवेल. दखल घेण्याची म्हणजे आंतरराष्ट्रीयस्तरावर स्वत:चा दबदबा निर्माण केलेल्या महिला भारतीय संघाकडून पदकाच्या सर्वाधिक आशा असल्याने त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. १९९२ मध्ये झालेल्या बार्सिलोना आॅलिम्पिकमध्ये भारतीयांनी प्रथम आपली दखल घेण्यास भाग पाडली. लिम्बाराम याने जगातील अव्वल ६ खेळाडूंमधून नामांकन मिळवताना आपली छाप पाडली. परंतु, पदक मिळवण्यात तो अपयशी ठरला. या वेळी त्याने ७० मी. प्रकारात ३६० पैकी ३३६ गुणांचा वेध घेत दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. मात्र, नव्याने तयार करण्यात आलेल्या नियमांचा फटका बसल्याने मोक्याच्या वेळी तो अपयशी ठरला. मात्र यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चांगलेच बहरले. रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या महिला संघाची बलाढ्य संघांमध्ये गणना होत आहे. एकेकाळी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर कब्जा केलेली दीपिका सध्या सातव्या स्थानी असली तरी, जेव्हा तिचा दिवस असतो तेव्हा ती सर्वांपेक्षा सरस ठरते. त्यामुळेच तिची क्षमता जाणून असलेले इतर प्रतिस्पर्ध्यांना तिचा विशेष धसका असेल. गेल्या वर्षी शांघायला झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत तिने वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली होती. २००६ मध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर दीपिकाने २००९ मध्ये कॅडेट वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय ठरली. त्याचवर्षी दीपिकाने ११ व्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पटकावल्यानंतर दोन वर्षांनी तिने आपले पहिले विश्वविजेतेपद पटकावले. याआधी लंडन आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या दीपिकाने त्या वेळी ८ व्या स्थानी मजल मारली होती. अनुभवी बोम्बायलादेवीची पुरेपूर साथ यंदा दीपिकाला लाभेल. दीपिका आणि बोम्बायला या दोघांचा अनुभव आणि लक्ष्मीरानी माझीचा जोष या जोरावर भारतीय संघ नक्की चमकदार कामगिरी करेल. बीजिंग आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या बोम्बायलादेवीला त्या वेळी सांघिक व वैयक्तिक प्रकाराची अंतिम फेरी गाठता आली नाही. कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी सांघिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देऊन बोम्बायलाने चांगली कामगिरी केली होती. सांघिक प्रकारात लक्ष्मीरानी माझीवरही भारताची खूप मदार असेल. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मोक्याच्या वेळी घेतलेल्या अचूक वेधामुळे भारताला रौप्य जिंकण्यात यश आले. त्याचवेळी वैयक्तिक गटातही आपल्याहून बलाढ्य खेळाडूंना धक्का देण्याची क्षमता राखून असल्याने लक्ष्मीरानीकडून चमत्कार घडल्यास आश्चर्य वाटायला नको. सातत्याने १० गुणांचा वेध घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीचा खेळ नक्कीच भारतासाठी निर्णायक ठरणारा असेल. अतानु दासरिओ आॅलिम्पिकमध्ये एकमेव भारतीय पुरुष तिरंदाज म्हणून अतानुवर पदकाच्या आशा असतील. भारताचा एकमेव खेळाडू असल्याने त्याच्यावर काही प्रमाणात नक्कीच दडपण असेल. वैयक्तिकच्या तुलनेत सांघिक प्रकारामध्ये लक्षवेधी कामगिरी केलेल्या अतानुने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन रौप्य व एक कांस्य अशी ३ आणि विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी २ रौप्य व कांस्य अशी ४ पदके जिंकली आहेत. त्यामुळेच आता आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात त्याची कामगिरी कशी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आॅलिम्पिकसाठी भारतीय तिरंदाजी संघटनेच्या (एएआय) वतीने घेण्यात निवड चाचणी स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून सहभागी झालेल्या अतानुने माजी आॅलिम्पियन चाम्पिया आणि जयंता तालुकदार अशा बलाढ्य खेळाडूंना धक्का देण्याचा पराक्रम करून रिओ तिकीट मिळवले. त्यामुळेच त्याच्याकडूनही पदकवेध होण्याचे संकेत आहेत.