शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

BCCI देणार महिला क्रिकेट टीमच्या प्रत्येक खेळाडूला 50 लाखांचं बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:54 IST

भारतीय महिला क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूंला बीसीसीआय प्रत्येकी 50 लाखांचं बक्षीस देणार आहे

ऑनलाइन लोकमत

 
मुंबई, दि. 22-  भारतीय महिला क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूंला बीसीसीआय प्रत्येकी 50 लाखांचं बक्षीस देणार आहे.तर सपोर्टिंग स्टाफला 25 लाखांचं बक्षीस बीसीसीआयने जाहीर केलं आहे. बीसीसीआयकडून शनिवारी या संदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. आयसीसी महिला विश्वचषकातील कामगिरीबद्दल बीसीसीआयने महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे. 
 
शुक्रवारी बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सी.के खन्ना यांनी बीसीसीआय महिला खेळाडूंना योग्य बक्षीस देणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसारच बीसीसीआयने शनिवारी बक्षीसाची घोषणा केली आहे.  आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी भारत-इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. भारताने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला होता.
 
बीसीसीआय महिला क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूच्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांना योग्य बक्षीस देणार आहे. प्रत्येक मॅचमध्ये टीम इंडियाची खेळी उत्तम होते आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. विशेष म्हणजे सगळ्यांनाच अभिमान वाटेल अशी खेळी हरमनप्रीत कौर या खेळाडूने केली आहे, असं सीके खन्ना म्हणाले होते. 
 
विश्वचषकाची अंतिम फेरी गाठल्याबद्दल बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिंनदन केले. बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी हरमनप्रीतच्या खेळीचे कौतुक करीत कर्णधार मिताली आणि संघाला फायनल जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. चर्चा केल्यानंतर विश्वचषकातील शानदार कामगिरीसाठी महिला संघाला रोख पुरस्कार घोषित करू, असं खन्ना म्हणालं होते.
 
सेमी फायनलमध्ये रन्सचा तडाखा
 
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सेमी फायनलच्या लढतीत मोक्याच्या वेळी झुंजार अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलचा त्रिफळा उडवत दीप्ती शर्माने घेतलेल्या बहुमूल्य बळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अष्टपैलू हरमनप्रीत कौरने झळकावलेल्या तुफानी दीड शतकानंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या भारताने गतविजेत्या बलाढ्य ऑस्टे्रलियाला ३६ धावांनी नमवलं. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४२ षटकांत ४ बाद २८१ धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ४०.१ षटकांत २४५ धावांवर थोपवलं.  हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाची जबरदस्त धुलाई करताना ११५ चेंडूत २० चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद १७१ धावांची तुफानी खेळी केली. भारताने निर्धारीत ४२ षटकात ४ बाद २८१ धावा केल्या.
 
पावसाच्या व्यत्ययानंतर उशीराने सुरु झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम नाणेफेकीचा निर्णय घेतला. स्मृती मंधना (६) आणि पूनम राऊत (१४) हे सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार मिताली राज (३६) व हरमनप्रीत यांनी डाव सावरला. हरमनप्रीतने यावेळी भारताकडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावांची वैयक्तिक खेळी केली. दीप्ती शर्माने याचवर्षी मे महिन्यात आयर्लंडविरुध्द १८८ धावा फटकावल्या होत्या. भारताची अडखळती सुरुवात झाल्यानंतर मिताली - हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. मात्र, मिताली २५व्या षटकात बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने सगळी सुत्रे आपल्याकडे घेत दीप्ती शर्मासोबत चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची निर्णायक भागीदारी केली