शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
3
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
4
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
7
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
8
जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
9
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
10
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
11
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
12
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
13
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
14
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
15
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
16
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
18
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
19
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
Daily Top 2Weekly Top 5

वन-डे क्रिकेटसाठी ४०० धावा चांगल्या नाहीत

By admin | Updated: October 29, 2015 22:25 IST

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील मुंबईत झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारतीय गोलंदाजांसाठी कठीण होता. खेळपट्टी सपाट होती, त्यावर गोलंदाजांसाठी काहीही नव्हते

रोहित नाईक, मुंबईभारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील मुंबईत झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारतीय गोलंदाजांसाठी कठीण होता. खेळपट्टी सपाट होती, त्यावर गोलंदाजांसाठी काहीही नव्हते. त्यामुळेच इतकी मोठी धावसंख्या उभी करता आली. परंतु हे क्रिकेटसाठी निश्चित चांगले नाही, अशा शब्दांत आॅस्टे्रलियाचा माजी दिग्गज जलदगती गोलंदाज ब्रेट ली याने आपली निराशा व्यक्त केली.ऐकू न येणाऱ्या व्यक्तींसाठी ब्रेट ली याने गुरुवारी मुंबईत साऊंड्स आॅफ क्रिकेट या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी ली याने ‘लोकमत’सह संवाद साधला. मुंबईतील भारत-द. आफ्रिका सामन्याविषयी लीने सांगितले की, सपाट खेळपट्टीवर गोलंदाजांसाठी काहीही नसते. मी कायमच वेगवान गोलंदाजांसाठी मदतशीर ठरेल अशा खेळपट्टीच्या बाजूने होतो. कारण ४३८ धावा एकदिवसीय सामन्यासाठी खूप जास्त आहेत. त्यामुळे असा आक्रमक खेळ क्रिकेटसाठी निश्चितच चांगला नाही.५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी लीने भारतीय गोलंदाजांना सल्ला दिला की, सुरुवातीलाच बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ठेवून त्यांना जास्त संधी देऊ नका. कामगिरीत सातत्य ठेवा. तसेच ईशांत शर्मा भारतासाठी महत्त्वाचा गोलंदाज असून, त्याची कामगिरी निर्णायक ठरेल. एका सामन्याच्या बंदीमुळे तो पहिल्या कसोटीस मुकणार असल्याने भारताला त्याची कमी भासेल, असेही ली याने सांगितले.आधुनिक क्रिकेटमध्ये गोलंदाजांकडून आखूड टप्प्याच्या तुलनेत यॉर्कर चेंडूचा वापर कमी होतो, यावर या दिग्गज गोलंदाजाने सांगितले की, यॉर्कर टाकणे ही एक कला आहे. या चेंडूवर फलंदाजांची नेहमी भंबेरी उडते. मात्र आज फलंदाज आक्रमक झाले आहेत. ते फटका मारण्याआधी दोन-तीन पाऊले पुढे येतात आणि अशा वेळी यॉर्कर चेंडूला लोअर फुलटॉस खेळून सीमारेषेबाहेर टोलावला जातो. त्यामुळे गोलंदाजाला स्थिरवण्याची संधी मिळत नाही. कदाचित यामुळे आज कमी प्रमाणात यॉर्कर पाहायला मिळत आहेत.