शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विंडीज बोर्डावर 250 कोटींचा दावा

By admin | Updated: November 2, 2014 00:59 IST

धर्मशाला येथे वन-डे सामना खेळल्यानंतर भारताचा दौरा तडकाफडकी सोडल्याबद्दल भारतीय क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर 250 कोटींचा नुकसानभरपाई दावा दाखल केला आहे.

ब्रिजटाऊन : धर्मशाला येथे वन-डे सामना खेळल्यानंतर भारताचा दौरा तडकाफडकी सोडल्याबद्दल भारतीय क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर 250 कोटींचा नुकसानभरपाई दावा दाखल केला आहे. बोर्डासोबत वेतन मुद्दय़ावर सुरू असलेल्या तंटय़ामुळे विंडीज खेळाडूंनी न खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे आधीच कंगाल झालेल्या विंडीज बोर्डाला बीसीसीआयने हा आणखी एक धक्का दिल्याने संकट कोसळू शकते.
बीसीसीआय सचिव संजय पटेल म्हणाले, की मी 25क् कोटी नुकसानभरपाई करण्याची मागणी असलेले पत्र विंडीज बोर्डाकडे पाठविले आहे. आम्ही दौरा सुरू ठेवण्यासाठी वारंवार आग्रह धरला; शिवाय मध्यस्थीची तयारीही दाखविली. तरीही दौ:यातून माघार घेतल्याने भारतीय क्रिकेटच्या नुकसानभरपाईचा दावा करणारे पत्र पाठवावे लागले. 
पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेपाठोपाठ विंडीजला भारताविरुद्ध एक टी-2क् सामना आणि हैदराबाद, बंगळुरू तसेच अहमदाबाद येथे कसोटी सामने खेळायचे होते.
बीसीसीआयने विंडीज बोर्डाला नुकसानभरपाई कशी करणार, याची ठोस योजना सादर करण्यासाठी दोन आठवडय़ांचा अवधी दिल्याचे विश्वसनीय सूत्रंनी सांगितले. असे न झाल्यास कॅरेबियन बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.
 
 
 
पटेल यांच्या स्वाक्षरीनिशी असलेल्या या पत्रत पुढे म्हटले आहे, की बीसीसीआयला जो आर्थिक फटका बसला, त्याची नुकसानभरपाई कशी करणार आणि त्यासाठी काय पावले उचलणार, हेदेखील स्पष्ट करावे. पत्र मिळाल्यापासून 15 दिवसांत अटी आणि शर्ती स्वीकारार्ह असल्याचा प्रस्ताव मिळाला नाही, तर बीसीसीआय भारतीय न्यायालयात आपल्या वकिलांमार्फत खटला दाखल करेल. ही पहिली नोटीस औपचारिक मागणी असल्याचे आपण मानू शकता. पटेल यांनी हे पत्र विंडीज क्रिकेट बोर्डाचे प्रमुख डेव्ह कॅमेरून यांना पाठविले आहे.(वृत्तसंस्था)
 
भारताची मनधरणी करावी : अॅण्डी रॉबर्ट्स
बीसीसीआयने 25क् कोटींचा नुकसानभरपाईचा दावा केल्यामुळे विंडीज बोर्डाचे अस्तित्व धोक्यात येणाची भीती व्यक्त करून हा दावा मागे घेण्यासाठी विंडीज अधिका:यांनी ताबडतोब भारतात दाखल होऊन समजूत काढायला हवी, असे मत विंडीजचे वेगवान गोलंदाज अॅण्डी रॉबर्ट्स यांनी व्यक्त केले.
बीसीसीआयने विंडीजसोबतचे क्रिकेट संबंध तोडलेच; शिवाय मोठय़ा रकमेची मागणी केली. यामुळे विंडीज क्रिकेट संपण्याची भीती आहे. यावर रॉबर्ट्स म्हणाले, ‘‘विंडीज बोर्ड आणि खेळाडूंमध्ये काय चालले आहे, हे पाहण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यापेक्षा विंडीजच्या अधिका:यांनी भारतात दाखल होऊन समजूत काढायला हवी. भारत-विंडीजदरम्यान पुढील आठ वर्षात पाच मालिकांचे आयोजन आहे. त्यात चार वेळा भारतीय संघ विंडीजचा दौरा करेल. भारताने हे दौरे न केल्यास आमच्या देशातील क्रिकेट रसातळाला जाईल.’’ दौरा अर्धवट सोडणा:या खेळाडूंच्या निर्णयाचा मी धिक्कार करतो; पण कुणाला दोषी धरण्याआधी सविस्तर माहिती मिळवावी लागेल, असे रॉबर्ट्स यांचे मत आहे. (वृत्तसंस्था)