शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

२१ वर्षीय सिंधूने ३ महिने वापरला नाही मोबाईल

By admin | Updated: August 20, 2016 16:34 IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये 'रौप्य' पदक पटकावत इतिहास रचणा-या पी.व्ही.सिंधूने अनेक आवडत्या गोष्टींचाही त्याग केला होता.

ऑनलाइन लोकमत
रिओ दि जानेरो, दि. २० - रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये 'रौप्य' पदक पटकावत इतिहास रचणा-या पी.व्ही.सिंधूमुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र  हे यश मिळवण्यासाठी सिंधूने प्रयत्नांची पराकाष्ठा करत अनेक आवडत्या गोष्टींचाही त्याग केला. सिंधूने तिचे आवडते पदार्थ हैदराबादी बिर्याणीचा त्याग केला तसेच आजच्या काळातील प्रत्येकाची मूलभूत गरज असलेल्या मोबाईलला सिंधूने तीन महिने हातही लावला नाही.
 आणखी वाचा : 
(रुपेरी सिंधू !)
  •  
 (पराभवानंतर सिंधूने जे केलं त्यामुळे तुम्हालाही अभिमान वाटेल)
 
  •  
पी. गोपीचंद हे अतिशय कडक शिस्तीचे प्रशिक्षक असून ऑलिम्पिकसाठी तयारी करणा-या सिंधूने त्यांच्या निगराणीखाली अथक मेहनत घेत सराव केला. सर्वोत्तम गोष्ट साध्य करायची असेल तर जीवनातील लहानसहान आनंदांचा त्याग केला पाहिजे, हे गोपीचंद यांचे सूत्र असून त्यांनी गेल्या काही महिन्यांत कडक शिस्तीत सिंधूकडून सराव करून घेतला .
एकाग्रता भंग करणाऱ्या तसेच मानसिक स्थिती बिघडवू शकणाऱ्या समाजमाध्यमांना सिंधूने स्वत:हून दीड महिना रामराम ठोकला. मात्र, काल रौप्य पदक  जिंकल्यानंतर पी. गोपीचंद  यांनी सिंधूला हवे तितके आईस्क्रीमही खाण्याची सूट दिली असून तिचा मोबाईल परत करणार असल्याचे सांगितले. रिओत दाखल झाल्यापासून मी तिच्या गोड खाण्यावर विशेषत: आईस्क्रीम खाण्यावर बंदी घातली होती. मात्र, आता सिंधू तिला हवे ते खाऊ शकणार आहे, असे गोपीचंद यांनी नमूद केले. 
 
कसे झाले सिंधूचे प्रशिक्षण
- ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सिंधूला तिची आवडती चॉकलेट्स आणि हैदराबादी बिर्याणी खाण्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. तसेच देवाचा प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरही बंदी घालण्यात आली.
 - उत्तेजकांसंदर्भातील कठोर नियमांमुळे सिंधूला बाहेरचं पाणी पिण्यासदेखील मज्जाव करण्यात आला होता. 
- सिंधूला एकटीने जेवण्यास परवानगी नव्हती, पी. गोपीचंद यांच्याबरोबरच भोजन घेणं अनिवार्य होते,  खाद्यपदार्थातून काहीही दिले जाऊ शकते या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली.
-  उंच उडी मारून प्रतिस्पध्र्याच्या दिशेने शरीरवेधी स्मॅश मारण्यासाठी गोपीचंद यांनी सिंधूचा खास सराव करून घेतला. सिंधूची उंची जास्त असल्याने प्रतिस्पर्धी तिला फटक्यांसाठी खाली वाकायला भाग पाडण्याची रणनीती आखतात. हे लक्षात घेऊन प्रदीर्घ रॅली आणि उंचीवरचे फटके खेळण्यावर भर राहील अशी रणनीती गोपीचंद यांनी आखली.
-  तासाभरापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या लढतींसाठी सक्षम राहण्यासाठी गेले वर्षभर व्यायामशाळेत वजन उचलण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. 
- रिओमध्ये खेळणा-या तरूणासोबत गोपीचंद यांनी स्वत: सराव केला. त्यासाठी त्यांनी गेल्या ८ महिन्यांपासून स्वत:च्या आहारात बदल करत वजन कमी केलं. तसेच त्यांनी त्यांच्या अकदामीमध्ये साखर व पावावर बंदी घालण्यात आली आहे.