शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

२०११ - २८ वर्षांनी भारत पुन्हा जगज्जेता

By admin | Updated: February 15, 2015 16:17 IST

कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाने घरच्या प्रेक्षकांसमोर विश्वचषकाचे विजेतेपद पटकावत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सोनेरी स्वप्न पूर्ण केले.

विश्वचषकाचे दहावे पर्व भारत, बांग्लादेश आणि श्रीलंका या देशांमध्ये पार पडले. १९ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या विश्वचषकात संघाची संख्या १४ वर आणण्यात आली. कर्णधार महेंद्रसिंग  धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाने घरच्या प्रेक्षकांसमोर विश्वचषकाचे विजेतेपद पटकावत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सोनेरी स्वप्न पूर्ण केले. 
विश्वचषकाच्या दहाव्या पर्वात डीआरएस प्रणालीचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला. याशिवाय अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही आयसीसीने जाहीर केला. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला १० व्या विश्वचषकाचे यजमानपद मिळू शकले नाही. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची विजयी परंपरा भारताने रोखली. ऑस्ट्रेलिया १९९९ नंतर विश्वचषकात एकदाही साखळी सामन्यात पराभूत झाला नव्हता. ऑस्ट्रेलियाचा हा विजयी रथ भारताने रोखला. क्वार्टर फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले. गौतम गंभीरच्या ९८ धावा आणि महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद ९१ धावांच्या खेळीने भारताने हे लक्ष्य  ४८. २ षटकांत चार गडी गमावून पार केले आणि २८ वर्षांनी भारत पुन्ह विश्वविजेता झाला. २१ वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने सहा विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला; परंतु जेतेपद पटकावता न आल्याची खंत त्याला सतावत होती. २००३ साली जेतेपदाच्या अगदी जवळ जाऊन भारताला परतावे लागले होते. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूने २०११चा विश्वचषक जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले. अखेरीस सचिनचे हे स्वप्न पूर्ण झाले. 
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ४९ 
एकूण धावा - २१, ३३३
एकूण विकेट्स - ७३१
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - तिलकरत्ने दिलशान - श्रीलंका (९ सामन्यात ५०० धावा)
सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज -  शाहिद आफ्रिदी - पाकिस्तान ( ८ सामन्यात २१ विकेट)