शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
3
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
4
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
5
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
6
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
7
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
8
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
9
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
10
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
11
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
12
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
13
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
14
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
15
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
16
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
17
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
18
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
19
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
20
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'

12 साल बाद.. भारत अंतिम फेरीत

By admin | Updated: October 1, 2014 02:00 IST

भारताने मंगळवारी सियोनहॅक हॉकी स्टेडियममध्ये यजमान कोरियाचा 1-क् ने पराभव केला आणि 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

 पाकविरुद्ध सुवर्णपदकासाठी झुंज : कोरीयाचा 1-क् ने पराभव

 
इंचियोन : आकाशदीप सिंगच्या शानदार मैदानी गोलच्या जोरावर भारताने मंगळवारी सियोनहॅक हॉकी स्टेडियममध्ये यजमान कोरियाचा 1-क् ने पराभव केला आणि 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान सुवर्णपदकासाठी झुंज रंगणार आहे. 
भारताने पहिल्या दोन क्वॉर्टरमध्ये गोल करण्याच्या तीन नामी संधी गमावल्यानंतर आकाशदीपने 44 व्या मिनिटाला गोल नोंदवीत संघाला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. अखेर आकाशदीपने नोंदविलेला गोल निर्णायक ठरला.  
यापूर्वी 2क्क्2 च्या बुसान आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविणा:या भारतीय पुरुष हॉकी संघाला फायनलमध्ये गुरुवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानने आज दुस:या उपांत्य लढतीत 2क्1क् ग्वांग्झू आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाचा शूटऑफमध्ये 6-5 ने पराभव केला. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संघाला 2क्16 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. साखळी फेरीत पाकविरुद्ध 1-2 ने पराभव स्वीकारणा:या भारतीय संघाला अंतिम फेरीत या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळणार आहे. 
आशियाई स्पर्धेत कोरियाविरुद्धच्या 14 सामन्यांतील भारताचा हा आठवा विजय आहे. कोरियाविरुद्ध आजतागायत खेळल्या गेलेल्या एकूण 72 सामन्यांपैकी भारताचा हा 29 वा विजय आहे. आज खेळल्या गेलेल्या लढतीत भारताने सुरुवातीपासून वर्चस्व गाजविले. कोरिया संघाला भारताचा बचाव भेदण्यात अपयश आले. भारतीय संघाने सातत्याने कोरियाच्या गोलक्षेत्रत मुसंडी मारली तर प्रतिस्पर्धी संघ त्यात अपयशी ठरला. 
दुस:या क्वॉर्टरच्या तिस:या मिनिटाला भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण प्रतिस्पर्धी संघाचा गोलकीपर ली याने व्ही. रघुनाथचे प्रयत्न हाणून पाडले. रमणदीप सिंग व गुरविंदरसिंग चांडी यांची कामगिरी निराशाजनक ठरली. पण वीरेंद्र लाक्रा, रघुनाथ, मनप्रीत सिंग व रूपिंदरपाल सिंग यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. गुरुबाजाने चमकदार कामगिरी केली. त्याला सुनीलने योग्य साथ दिली. आकाशदीपने 44 व्या मिनिटाला अप्रतिम गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. पिछाडीवर पडलेल्या कोरियन संघाने अखेरच्या क्वॉर्टरमध्ये आक्रमक खेळ केला. पण भारताचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. सामना संपायला दोन मिनिटांचा अवधी शिल्लक असताना कोरियाला पहिला व एकमेव पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण भारताने  उत्कृष्ट बचाव करीत त्यांचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न हाणून पाडले. (वृत्तसंस्था)