शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अँटिग्वा कसोटीनंतर झालेले १० विक्रम

By admin | Updated: July 25, 2016 17:12 IST

विराट कोहली हा दिलीप सरदेसाई, सुनील गावसकर, नवज्योतसिंग सिद्धू आणि वासिम जाफर यांच्यानंतरचा पाचवा फलंदाज ठरला. यासरखेच या कसोटी सामन्यानंतर अनेक विक्रम झाले. त्यापैकी काही विक्रम आपण जाणून घेऊ...

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २५ : आर अश्विनची अष्टपैलू खेळी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाच्या बळावर भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध धडाकेबाज विजय मिळवला. ४ कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. पहिला कोसोटी सामना भारताने चौथ्या दिवशीच जिंकत विराट विजय मिळवला. या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजला फॉलो ऑन दिला. वेस्ट इंडिजवर घरच्या मैदानात फॉलो ऑनची नामुष्की ओढवण्याची ही आठवी वेळ ठरली. विराट कोहलीचे द्विशतक आणि अश्विनची फिरकी या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरले. तर कॅरेबियन भूमीत द्विशतक फटकावणारा विराट कोहली हा दिलीप सरदेसाई, सुनील गावसकर, नवज्योतसिंग सिद्धू आणि वासिम जाफर यांच्यानंतरचा पाचवा फलंदाज ठरला. यासरखेच या कसोटी सामन्यानंतर अनेक विक्रम झाले. त्यापैकी काही विक्रम आपण जाणून घेऊ...- वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या अँटिग्वा कसोटीत विराटने २८३ चेंडूत २०० धावांची खेळी केली. त्याबरोबरच परदेशी भूमीवर द्विशतकी खेळी करणारा विराट भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. तसेच गेल्या दहा वर्षात भारतीय उपखंडाबाहेर द्विशतक फटकावणारा विराट हा पहिला फलंदाज ठरलाय. यापुर्वी, २००६मध्ये वासीम जाफरने वेस्ट इंडिज दौ-यातच द्विशतकी खेळी केली होती. (भारताचा 'विराट' विजय, अश्विनची अष्टपैलू खेळी)

- भारताने एक डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला. भारताचा भारतीय उपखंडाबाहेरचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी सप्टेंबर २००५ मध्ये भारताने झिम्बाब्वेवर एक डाव आणि ९० धावांनी विजय मिळवला होता.- सामनावीर रविचंद्रन अश्विनने एकाच कसोटीत शतक आणि डावात पाच बळी टिपण्याचा पराक्रम दुसऱ्यांदा केला. याआधी नोव्हेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत झालेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने अशी कामगिरी केली होती.

   - अश्विनने दुसऱ्या डावात ८३ धावा देत ७ बळी टिपले. त्याची भारताबाहेरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच भारतीय उपखंडाबाहेर त्याने पहिल्यांदाच पाच बळी टिपले.- भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने पहिल्या डावात यष्टीमागे सहा फलंदाजांची शिकार केली. त्याबरोबरच त्याने एका डावात यष्टीमागे सर्वाधिक सहा शिकार करण्याच्या सय्यद किरमानी आणि महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

- भारताविरुद्धच्या गेल्या १६ कसोटीतील वेस्ट इंडिजचा हा नववा पराभव. भारताने २००२ साली केलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील पाचव्या कसोटीत वेस्ट इंडिजने भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यानंतर कसोटी सामन्यात भारताला हरवणे वेस्ट इंडिजला शक्य झालेले नाही.- अनिल कुंबळेने प्रशिक्षक पदाची धुरा संभाळल्यानंतर पहिल्याच कसोटीत भारताचा विजय.- ४९६ कसोटीतील भारताचा १२८ वा विजय, तर वेस्ट इंडिजचा ५१४ कसोटीतील १७८ वा पराभव- भारताचा वेस्ट इंडिज वरील १७वा विजय, तर वेस्ट इंडिजमधील सहावा विजय.- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ११व्या कसोटीतील भारताचा हा सहावा विजय.