शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

जि.प, पं.स जानेवारीच्या आत

By admin | Updated: September 18, 2014 23:33 IST

ठाणो जिल्हा विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला

पालघर : ठाणो जिल्हा विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला असून  जिल्हापरिषदेच्या 57 निर्वाचीत विभाग (गट) व पंचायत समितीच्या 144 गणांची गटनिश्चिती करण्याचे काम प्राथमिक स्वरूपात पुर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली.
ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानतर तेरा पंचायत समित्याचा कार्यकाल बरखास्त करण्यात आल्यानंतर जिल्हापरिषदेसह पंचायत समितीवर सध्या प्रशासकीय कामकाज सुरू आहे. हा प्रशासकीय कार्यकाल सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवता येत नसल्याने विधानसभा निवडणुका पार पडल्या पडल्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील 16 लाख 24 हजार इतकी लोकसंख्या असून पालघर तालुक्यात सर्वाधिक जिल्हापरिषदेचे 17 गट तर पंचायत समितीचे 34 गण तयार करण्यात आले असून सर्वात कमी मोखाडा तालुक्यात जिल्हापरिषदेचे तीन गट व पंचायत समितीचे सहा गण अस्तित्वात येणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या लोकसंख्येच्या आधारे जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गण तयार करण्यात आले असून पालघर तालुक्यात 4 लाख 81 हजार लोकसंख्येनूसार जिल्हापरिषद 17 गट तर पंचायत समिती 34 गणांची निश्चिती संख्या करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यात 3 लाख 51 हजार लोकसंख्या असन जि. प. 12 गट तर पं. स. च्या 24 जागा, तलासरी तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 54 हजार असून जिल्हापरिषदेच्या 5 तर पंचायत समितीच्या 1क् जागा, विक्रमगड तालुक्याची 1 लाख 37 हजार लोकसंख्या असून जिल्हापरिषदेसाठी 5 गट तर पंचायत समितीसाठी 1क् गणाच्या जागा, जव्हार तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 28 हजार असून जिल्हापरिषदेच्या 5 गट तर पंचायत समितीचे 1क् गण, वाडा तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 78 हजार इतकी असून जिल्हापरिषदेच्या 6 गट तर पंचायत समितीचे 12 गण, वसई तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 8 हजार इतकी असून जिल्हापरिषदेचे 4 गट तर पंचायत समितीचे 8 गण, तर सर्वात कमी लोकसंख्या व जागा मोखाडय़ाची राहणार असून 83 हजार लोकसंख्या आधारावर जिल्हा परिषदेच्या 3 गट जागा तर पंचायत समितीच्या 6 गणांची जागांची निश्चिती करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. विधानसभा निवडणुका पार पाडल्या नंतर अल्पावधीतच वरील निवडणुका पार पडून 31 जानेवारी 2क्14 च्या आत नवीन जि. प. व पं. स. अस्तित्वात येणार आहेत. (वार्ताहर)
 
निवडणूका नंतर मुहूर्त
विधानसभा निवडणुका पार पडल्या नंतर 31 जानेवारी 2क्14 च्या आत नवीन जि. प. व पं. स. अस्तित्वात येणार आहेत.