शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

शाळेतील पटसंख्या वाढल्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 05:10 IST

जयंत पाटील : आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे वितरण

अलिबाग : भविष्यात गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणे, शिक्षकांची नोकरी टिकणे फार कठीण होणार आहे. विद्यार्थी टिकला पाहिजे, या भूमिकेतून शिक्षकांनी काम केल्यास भविष्यात समायोजन करण्याची वेळ येणार नाही. ज्या शाळेची पटसंख्या वाढेल त्या शिक्षकांचा जिल्हा परिषदेने सत्कार करावा. आदर्श शिक्षकांबरोबरच चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे, प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.

रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा अलिबागमधील चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. शिक्षण क्षेत्रात आणि अभ्यासक्रमात झालेल्या फेरबदलामुळे शिक्षकांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. डीएड-बीएड कॉलेज बंद करण्याची वेळ येऊ लागली आहे. इंग्रजी शाळांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होऊ लागली आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनील तटकरे यांनी सांगितले.शिक्षणाबरोबरच सामाजिक आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करणे आवश्यक आहे. समाजाच्या वेगवेगळ्या विकासासाठी, नवचैतन्यासाठी गुरुजनांनी पुढाकार घेऊन उत्तमरीत्या पाया घडविला पाहिजे. एके काळी मुंबई, पुणे, लातूर पॅटर्नची मक्तेदारी होती; परंतु ही मक्तेदारी मोडीत काढत कोकणचा वेगळा पॅटर्न दहावी व बारावी परीक्षेत राज्यात अव्वल स्थानावर आहे. रायगड जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याने त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.प्राथमिक विभागातील १५ आणि माध्यमिक १५ अशा एकूण ३० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. आ. पंडित पाटील, आ. बाळाराम पाटील, आ. श्रीकांत देशपांडे, जि.प. अध्यक्ष अदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील आदीसह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळा