शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

वर्षभरानंतरही स्थिती जैसे थे !

By admin | Updated: August 16, 2015 23:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इरादापत्रे देण्यात येऊन वर्ष उलटले; तरीही जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भूखंड देण्यात आलेले नाहीत.

उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इरादापत्रे देण्यात येऊन वर्ष उलटले; तरीही जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भूखंड देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रविवारी केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला. उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलनात भाग घेतला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुंडन केले आणि पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आलेल्या इरादापत्रांचे जाहीररीत्या श्राद्ध घातले. करळफाटा येथे उरण उत्कर्ष समितीच्या वतीने रविवारी (१६) हे आंदोलन करण्यात आले. जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न मागील ३० वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्रात सत्ता उपभोगणाऱ्या यूपीए सरकारने वारंवार आश्वासने देऊन जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडले आहे. सत्तेवर आल्याबरोबर केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सुमारे ३० वर्षांपासून प्रलंबित राहिलेला साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १६ आॅगस्ट २०१४ रोजी जेएनपीटी सेझ प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी उरणमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंड वाटपाच्या इरादापत्रांचे वाटप करण्यात आले होते. मात्र वर्षभरात शेतकऱ्यांना एक इंचही जागेचे वाटप करण्यात आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इरादापत्रांचे वाटप झाल्यानंतरही भूखंड मिळत नसल्याने १६ आॅगस्टला शेतकऱ्यांच्यावतीने इरादापत्रांचे वर्षश्रद्ध घालण्याचा इशारा उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने पंतप्रधानांना दिला होता. उरण उत्कर्ष समितीने जाहीर केलेल्या या वर्षश्राद्ध आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादीने जाहीर पत्रक काढून पाठिंबाही दिला होता. त्यानुसार करळफाटा येथे रविवारी (१६) इरादापत्रांचे श्राद्ध घालण्यात आले. या प्रसंगी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भावना घाणेकर आदींसह नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. संतप्त झालेल्या शेकडो जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, काँग्रेसचे जे. डी. जोशी, भूषण पाटील आणि शेतकऱ्यांनी केंद्र - राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला. इतक्यावरच न थांबता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुंडन करून घेऊन पंतप्रधानांच्या हस्ते वाटप केलेल्या इरादापत्रांचे जाहीररीत्या श्राद्ध घातले. (वार्ताहर)