शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

महामुंबईतील ४०० स्थानकांच्या परिसराच्या परिवहन केंद्रित विकासासाठी जागतिक बँकेचा हात

By नारायण जाधव | Updated: June 19, 2023 17:52 IST

रस्ते, पुलांच्या निर्मितीसह परिसरात रोजगार निर्मिती आणि गृहबांधणीसह वाहतूक सुविधांवर भर देण्यात येणार आहे.

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील नऊ महापालिकांसह अंबरनाथ-बदलापूर नगरपालिका ते कर्जत-कसारापर्यंतच्या परिसरातील सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा आणि येणारे विकास प्रकल्प लक्षात घेऊन एमएमआरडीएने आता परिवहन केंद्रित शाश्वत विकासावर भर दिला आहे. यासाठी ४०० स्थानकांसह त्या परिसराचा जागतिक बँकेच्या मदतीने चेहरामोहरा बदलून विकास करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

यात विस्तीर्ण रस्ते, पुलांच्या निर्मितीसह परिसरात रोजगार निर्मिती आणि गृहबांधणीसह वाहतूक सुविधांवर भर देण्यात येणार आहे. जेणेकरून राहण्याच्या ठिकाणी अथवा आसपास रोजगार निर्मिती होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यावर भर दिला आहे. यासाठी एमएमआरडीएने जागतिक बँकेशी सहकार्य करार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार गेल्या आठवड्यात बैठक पार पडली आहे.

सर्व परिवहन मार्गांचा विचार करणार

जागतिक बँकेच्या कौशल्याचा फायदा घेऊन आणि महामुंबईतील रेल्वे, मोनो, मेट्रो लाईनसह मुंबईची बेस्ट, ठाण्याची टीएमटी, नवी मुंबई महापालिकेची एनएमएमटी, कल्याण-डोंबिवलीची केडीएमटी या बससेवांची स्थानके, त्यांच्या सेवा, लोकल, मेट्रो, मोनो मार्ग, बुलेट ट्रेनची स्थानके यांचा विचार करून त्यानुसार परिवहन केंद्रित शाश्वत विकासावर भर देेऊन त्यादृष्टीने पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. यानुसार विविध ४०० स्थानकांचा यासाठी विचार करून महामुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.

येथे विस्तीर्ण दळणवळण सुविधा वाढविणार

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने २०१७ मध्ये देशभरातील मोठ्या महानगरांत परिवहन केंद्रित विकासाची संकल्पना मांडली होती. त्यादृष्टीने महामुंबईचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएने जागतिक बँकेची मदत घेतली आहे. कारण, गेल्या वर्षांपासून आर्थिक राजधानी मुंबईचा पसारा नवी मुंबई, उरण-पनवेल, ठाणे-भिंवडी, अंबरनाथ-बदलापूर ते मीरा-भाईंदर-वसई परिसरात वाढला आहे. भिवंडी-नवी मुंबईत जेएनपीटीमुळे लाॅजिस्टिक पार्क वाढत आहे. ग्रामीण भागातील कर्जत-कसारा परिसराचा विकास माेठ्या वेगाने होत आहे. त्या दृष्टीने या भागात राहण्यास येणाऱ्या वाढत्या लोकसंख्येला आणि येणाऱ्या उद्योगांसाठी हा परिवहन केंद्रित विकास करण्यात येणार आहे.

परिवहन केंद्रित विकासासाठी सर्व प्रकारची दळणवळणाची साधने अत्यावश्यक आहेत. जेणेकरून कोणत्याही भागातून कोणत्याही मार्गाने कोणत्याही ये-जा करणे सोपे होईल. त्या दृष्टीने शहर बस सेवा, टॅक्सी, खासगी वाहनांसह लोकल, मेट्रो, मोनो मार्ग, बुलेट ट्रेनची स्थानके एकमेकांना जोडून हा परिवहन केंद्रित विकास साधण्यात येणार आहे. येत्या काळात मुंबईतील कोस्टल राेड, मुंबई-दिल्ली डेडिकेटेड फ्रेट काॅरिडॉर, मुंबई-दिल्ली महामार्ग, मुंबई-नवी मुंबई सी लिंक अर्थात एमटीएचएलआर, विरार-अलिबाग काॅरिडॉरसह जलवाहतुकीच्या जेटी एकमेकांना जोडल्यावरच परिवहन केंद्रित शाश्वत विकास शक्य होणार आहे.

हरित पट्टे निर्माण करणार

केवळ विस्तीर्ण महामार्ग, मोठमोठे पूल, सी लिंक, रेल्वे, मेट्रो मार्ग बांधले, गृहनिर्मिती केली केली म्हणजे परिहवन केंद्रित विकास झाला असे नाही. यात मोठ्या प्रमाणात वृक्षांसह खारफुटीची कत्तल होणार आहे. ही हानी भरून काढण्यासाठी पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी ठिकठिकाणी हरित पट्टे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

नवी मुंबईत गृहनिर्मिती सुरू

परिवहन केंद्रित विकास लक्षात घेऊन नवी मुंबईतील विविध नोडमध्ये सिडकोने ज्या ९० हजार घरांचे बांधकाम सुरू केले आहे. ते रेल्वे, बसस्थानकांच्या परिसरातच सुरू केले आहे. तळोजा, द्रोणागिरी, खारकोपर, बामणडोंगरी आणि जुईनगर येथील सिडकोची घरे ही रेल्वे स्थानके, बसस्थानकांसह महामार्गाला लागूनच बांधण्यात येत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई