शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कामगारांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: July 10, 2015 03:01 IST

शहराची साफसफाई करणारे व कचरा उचलणाऱ्या कामगारांचे जीवन कष्टमय झाले आहे. दिवसभर कचऱ्यात काम केल्यामुळे अनेकांना गंभीर आजार झाले आहेत.

नामदेव मोरे, नवी मुंबईशहराची साफसफाई करणारे व कचरा उचलणाऱ्या कामगारांचे जीवन कष्टमय झाले आहे. दिवसभर कचऱ्यात काम केल्यामुळे अनेकांना गंभीर आजार झाले आहेत. अनेकांचे अकाली निधन झाले आहे. कष्टकऱ्यांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, आतापर्यंत एकदाही सर्व कामगारांची संपूर्ण आरोग्य तपासणी झालेली नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. सिंगापूरप्रमाणे शहराला वैभव प्राप्त करून देण्याच्या वल्गना नेते व अधिकारी अनेक वेळा असतात. परंतु सफाई कामगारांचे राहणीमान सुधारावे याकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही. धुळीमुळे अनेकांना क्षयरोग, दमा व इतर आजार झाले आहे. कचरा उचलणारे कामगार कचऱ्याच्या गाडीमध्ये उभे राहिलेल्याचे अनेक ठिकाणी दिसते. गुडघाभर कचऱ्यात उभे राहून काम करावे लागते. कचराकुंडीच्या आजूबाजूला कचरा पडलेला असतो. तो उचलून गाडीत टाकावा लागतो. गमबुट, मोजे, मास्क या अत्यावश्यक वस्तू दिल्या जात नाहीत. परंतु यापूर्वी वर्षानुवर्षे कोणत्याही सुविधेविना कामगार कचरा उचलण्याचे काम करत आहेत. अनेक कामगारांचे अकाली निधन झाले आहे. अनेकांच्या वारसांना नोकरी देऊन उत्तरदायित्व संपविण्यात आले आहे. परंतु कामगाराचा मृत्यू नक्की का झाला याचे कारण शोधण्याचा कोणीच प्रयत्न केलेला नाही. अनेकांना दारूचे व्यसन लागले आहे. दिवसाचे ५ ते ८ तास श्वास घेण्यासही त्रास होत असलेल्या कचऱ्यात राहिल्यामुळेच ही व्यसने लागली आहेत, याकडे मात्र सर्वजण दुर्लक्ष करत आहेत. आरोग्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, सर्व कंत्राटी कामगारांची किमान वर्षातून एकदा पूर्णपणे शारीरिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कामगार व्यक्त करत आहेत.