शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीत गटारांची कामे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 02:09 IST

आरसीसी बांधकाम : पनवेल-सायन महामार्गावर पाणी साचण्याची शक्यता

कळंबोली : सायन-पनवेल महामार्ग खड्डेमुक्त करण्याबरोबरच लगतच्या आरसीसी गटारांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. पावसाळ्याआधी हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र बहुतांश ठिकाणची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन महामार्गावर पाणी साचण्याची शक्यता आहे.

खड्ड्यांमुळे पनवेल-सायन महामार्गावर अक्षरश: चाळण झाली होती. बांधकाम विभागाकडून त्यावर उपाययोजना म्हणून ज्या ठिकाणी खड्डे पडले होते, त्याठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर कळंबोली वसाहत ते कामोठे बसथांबा, कोपरा गाव येथे कोट्यवधी रुपये खर्च करून आरसीसी नाले बांधण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळ्याआधी हे काम पूर्णत्वास नेण्यात येईल, असे विभागाकडून सांगण्यातही आले होते. मात्र अद्याप बहुतांश कामे अपूर्ण असल्याने यंदाही महामार्ग पाण्यात जाण्याची शक्यता आहे.गेल्या तीन वर्षांपासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहनांना पाण्यातूनच वाट काढावी लागते. गुडघाभर पाण्यातून वाहने गेल्याने त्यात पाणी शिरून वाहने बंद पडतात. यंदा बांधकाम विभागाने नाल्यातील गाळ तसेच मोऱ्या काढून उपाययोजना केल्या असल्या तरी ही कामे अपूर्ण आहेत. यासाठी तब्बल १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असले तरी काम पूर्ण न झाल्याने यंदाही चालक तसेच पादचाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी व्यक्त केली आहे.पावसाळ्यात रस्त्यावर पाणी भरल्यास नाले, खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने फसले जाऊन दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे मत खारघर विकास समितीचे अध्यक्ष भूषण म्हात्रे यांनी व्यक्त केले. काँक्रीटीकरणासाठी ७७ कोटी तसेच नाल्यासाठी १८ कोटी रुपये खर्च करूनही यंदा पावसाळ्यात त्रास कायम राहणार आहे. या संदर्भात बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.महामार्गावरील भुयारी मार्ग बारा महिने पाण्यातमहामार्गावर कामोठे व कळंबोली वसाहतीत जाण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात आले आहे. याचा प्रवाशांसाठी आजतागायत कधीच उपयोग झाला नाही. कारण बारा महिने यात पाणी साचत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रवासी महामार्ग ओलांडताना लहान-मोठे अपघात घडल्याचे नागरिक सांगतात. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई