शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शासकीय कार्यालयांत कामकाज ठप्प; कर्मचाऱ्यांना निवडणुकीची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:39 IST

महत्त्वाच्या कार्यालयांमध्येही शुकशुकाट; नागरिकांची गैरसोय

- वैभव गायकर पनवेल : अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीची जबाबदारी दिल्यामुळे पनवेल परिसरामधील बहुतांश सरकारी कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले आहे. अपुºया कर्मचाºयांमुळे कामे होत नाहीत. हेलपाटे मारूनही कामे न झाल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेगाने सुरू आहे. रायगड मतदारसंघामध्ये मंगळवारी मतदान होत असून मावळ व ठाणे मतदारसंघाची निवडणूक २९ एप्रिलला होणार आहे. पनवेलमधील महानगरपालिकेसह बहुतांश सर्व सरकारी कार्यालयामधील अधिकारी व कर्मचाºयांना निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यालयामधील बहुतांश कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा परिणाम कामकाजावर होऊ लागला आहे. सद्यस्थितीमध्ये महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीसमस्या सर्वात गंभीर झाली आहे. अपुºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कचरा व गटारांची समस्याही वाढली आहे. नागरी समस्या सोडविण्यासाठी नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सिडकोसह महापालिकेच्या कार्यालयामध्ये जात आहेत. तेथे जाणाºया नागरिकांना आचारसंहिता सुरू आहे.कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण दिले जात आहे. कामे होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. इतर वेळी नगरसेवक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी नागरी समस्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात. परंतु राजकीय पदाधिकारीही प्रचारामध्ये व्यस्त असून आचारसंहितेमुळे अनेकांच्या पाठपुराव्याला व आंदोलनाला मर्यादा येत असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत.पनवेलमधील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक, मेट्रो सेंटर व इतर कार्यालयामधील कामकाजही जवळपास ठप्प आहे. कामासाठी गेलेल्या नागरिकांना निवडणूक व आचारसंहिता असल्यामुळे आता कामे होणार नाहीत अशी उत्तरे ऐकायला मिळत आहेत. तहसील व इतर कार्यालयामध्ये इतर वेळी दिवसभर नागरिकांची गर्दी असायची. अधिकारी व कर्मचाºयांना जागेवरून काही वेळ बाजूला जाण्यासही वेळ मिळत नाही अशी परिस्थती असायची. पण सद्यस्थितीमध्ये अनेक कार्यालये ओस पडली आहेत. काही विभागामध्ये एकही कर्मचारी नसल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे. निवडणुका होईपर्यंत हीच स्थिती असणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात येत आहे.प्रतिज्ञापत्र करण्याची गैरसोयशासकीय पातळीवर प्रत्येक कामाला सत्य प्रतिज्ञापत्र करणे बंधनकारक असते. तहसील कार्यालयात हे काम चालते. मात्र तहसील कार्यालयात कोणीच उपलब्ध नसल्याने प्रतिज्ञापत्राअभावी अनेकांची कामे अडकली आहेत.निवडणुकीसाठी कर्मचाºयांची आवश्यकता असली तरी त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार नाही व सरकारी कार्यालयामधील कामकाज पूर्णपणे ठप्प होऊ नये अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.कामे होत नसल्याने नाराजीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. यामध्ये पंचायत समिती, महानगर पालिका, सिडको, तहसीलदार, प्रांत, भूमी अभिलेख विभाग, सहायक दुय्यम निबंधक आदी कार्यालये कर्मचाºयांच्या अभावी ओस पडली आहेत. अनेक नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले असून अनेकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.जमीन खरेदी-विक्र ीचे व्यवहार ठप्पपनवेल तालुक्यात सहायक दुय्यम निबंधकांची एकूण पाच कार्यालये आहेत. पाचही कार्यालयांचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने जमीन नावावर करणे, घरे खरेदी-विक्र ी आदी व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या कार्यालयात सध्याच्या घडीला शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक